एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करायचे आहे: केसीआर

KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे.

KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या (BJP Government) नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे. भाजपवर  (BJP)  हल्ला करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार संवेदनशील नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekhar Rao) हे देखील मंचावर उपस्थित होते. नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही एवढी मोठी कामे केलीत. पण तुमच्यावर कोणी टीका कशी करू शकते, हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे.

नितीश कुमार यांनी केसीआर यांची केली स्तुती 

आंध्र प्रदेशातून वेगळे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या राव यांच्या प्रयत्नांचा संदर्भ देत नितीश कुमार म्हणाले की, राव तेलंगणाच्या निर्मितीसाठी 2001 पासून लढत होते. आज लोक काहीही बोलतात, पण तुम्ही तेलंगणाला वेगळे राज्य दिले. मग तिथली जनता तुमची बाजू कशी सोडणार. 

नरेंद्र मोदी सरकारने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून नितीश कुमार म्हणाले की, ज्यांना काही काम करायचे नसते, ते फक्त प्रचार करतात. ते म्हणाले, आता केंद्राकडून राज्यांना मिळणारी रक्कम कमी होत आहे. आधी राज्याला जितके पैसे मिळत होते. तितकेही आता मिळत नाही. 

केसीआर यांनी भाजपला केलं लक्ष्य 

पत्रकारांशी संवाद साधताना केसीआर म्हणाले की, देशाची स्थिती वाईट आहे. देशात चार लाख मेगा वॅट विजेची उपलब्धी आहे. तरीही विजेसाठी तळमळ करावी लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था घसरली आहे, कर्ज वाढले आहे. ते म्हणाले की, सरकार विरोधकांशी चर्चा करत नाही. लोकांना पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. देशाची राजधानी दिल्लीतही पुरेसे पाणी नाही. लोकांना 24 तास वीज मिळत नाही. त्यांची क्षमता किती आहे, हे देशासमोर आले आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे.

ते म्हणाले की, धर्माच्या नावावर देश तोडणे हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे आज नितीशजींची भेट घेतल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपमुक्त भारतचा नारा द्यावा. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की, या देशाला भाजपपासून धोका आहे, हे समजून घ्या. नितीश कुमार हे देशातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत. काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करावेत लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
West Bengal : बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget