एक्स्प्लोर

काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करायचे आहे: केसीआर

KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे.

KCR Nitish Kumar Attacks BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी बुधवारी केंद्रातील भाजपच्या (BJP Government) नेतृत्वाखालील सरकार विकासकामांऐवजी केवळ प्रचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप केला आहे. भाजपवर  (BJP)  हल्ला करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार संवेदनशील नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekhar Rao) हे देखील मंचावर उपस्थित होते. नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही एवढी मोठी कामे केलीत. पण तुमच्यावर कोणी टीका कशी करू शकते, हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे.

नितीश कुमार यांनी केसीआर यांची केली स्तुती 

आंध्र प्रदेशातून वेगळे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या राव यांच्या प्रयत्नांचा संदर्भ देत नितीश कुमार म्हणाले की, राव तेलंगणाच्या निर्मितीसाठी 2001 पासून लढत होते. आज लोक काहीही बोलतात, पण तुम्ही तेलंगणाला वेगळे राज्य दिले. मग तिथली जनता तुमची बाजू कशी सोडणार. 

नरेंद्र मोदी सरकारने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून नितीश कुमार म्हणाले की, ज्यांना काही काम करायचे नसते, ते फक्त प्रचार करतात. ते म्हणाले, आता केंद्राकडून राज्यांना मिळणारी रक्कम कमी होत आहे. आधी राज्याला जितके पैसे मिळत होते. तितकेही आता मिळत नाही. 

केसीआर यांनी भाजपला केलं लक्ष्य 

पत्रकारांशी संवाद साधताना केसीआर म्हणाले की, देशाची स्थिती वाईट आहे. देशात चार लाख मेगा वॅट विजेची उपलब्धी आहे. तरीही विजेसाठी तळमळ करावी लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था घसरली आहे, कर्ज वाढले आहे. ते म्हणाले की, सरकार विरोधकांशी चर्चा करत नाही. लोकांना पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. देशाची राजधानी दिल्लीतही पुरेसे पाणी नाही. लोकांना 24 तास वीज मिळत नाही. त्यांची क्षमता किती आहे, हे देशासमोर आले आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे.

ते म्हणाले की, धर्माच्या नावावर देश तोडणे हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे आज नितीशजींची भेट घेतल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपमुक्त भारतचा नारा द्यावा. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की, या देशाला भाजपपासून धोका आहे, हे समजून घ्या. नितीश कुमार हे देशातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत. काही करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करावेत लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलंThackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
Embed widget