एक्स्प्लोर

High Court : अकृषक जमिनीच्या सेसवरील 71 वर्षे जुना वाद अखेर निकाली, सेस वसुलीवर 4 महिन्यांची स्थगिती

राज्य सरकारला सेस देण्याची प्राथमिक जबाबदारी ही नासुप्रची आहे. जेव्हापासून भूखंड त्यांना हस्तांतरित झाला तेव्हापासूनच त्यांच्यावर लागू करण्याचे अधिकार नासुप्र आहेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

नागपूरः शहरातील एका अकृषक जमिनीवर नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)ने (Nagpur Improvement Trust) 1951 पासून सेस प्रकरणातील वाद तब्बल 71 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Mumbai High Court Nagpur Bench) निकाली काढला. यासंदर्भात न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नासुप्रकडे निवेदन करण्याचे आदेश दिले असून नासुप्रने त्यावर तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, असेही नमूद केले.

या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेंजिस यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, स्वातंत्र्यानंतर नागपूर शहराची नव्याने रचना होत होती. यावेळी शहर नियोजनाअंतर्गत ( Town Planning) विविध व्यवसाय आणि रहिवासी (Commercial and residential) उपयोगांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले. पुढे शहराचा विस्तार होऊ लागला आणि कृषी जमिनीचे अकृषक जमिनीत रुपांतरण करण्यात आले. 1978 साली राज्य सरकारने एक नवा कायदा आणला. त्यानुसार, नागपूर सुधार प्रन्यासने ज्या भूखंडांचे अकृषक (non agricultural) म्हणून रुपांतरण केले. त्यांच्यावर अकृषक सेस कर लावण्यात आला. नासुप्रने हा सेस भूखंड धारक आणि लीजधारकांवर (Leaseholders) लावला. 

भूखंड हस्तांतरित झाल्यापासून सेस लावण्याचे अधिकार

या प्रकरणी राज्य सरकारला (State Government of Maharashtra) सेस देण्याची प्राथमिक जबाबदारी ही नासुप्रची आहे. जेव्हापासून भूखंड त्यांना हस्तांतरित झाला तेव्हापासूनच त्यांच्यावर लागू करण्याचे अधिकार नासुप्र आहेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र, नासुप्रने 1951 पासूनचा सेस लावला आणि ते अयोग्य होते, असे याचिकाकर्त्यांचे (Petitioner) म्हणणे होते. अखेर तरुण पटेल, घर मालक समस्या निवारण संघ आणि अभ्यंकर नागरिक मंडळाने (Abhyankar Nagar Mandal) या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तक्रारींबाबत तसेच, नासुप्रला (NIT) निवेदन द्यावे, असे आदेश याचिकाकर्त्याला दिले. नासुप्रने त्यावर तीन महिन्यांत निर्णय (Decision within three months) घ्यावा, असेही नमूद केले. न्यायालयाने या जमिनीच्या सेस वसुलीवर 4 महिन्याची स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अथर्व मनोहर, अॅड. आनंद परचुरे, अॅड. अजय मोहगांवकर यांनी, नासुप्रतर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी आणि राज्य सरकारकडून अॅड. के. एल. धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

NMC Elections 2022 : नागपूर महानगरपालिकेत भाजप-शिंदे सेना 120 जागा जिंकणार, खासदार कृपाल तुमाने यांचा दावा

Nagpur Ganeshotsav 2022 : गणेश मंडपातून आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी घेतले बुस्टर डोस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India in Delhi : T20 World Cup घेऊन येणाऱ्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी खास केक | T20 Wolrd CupABP Majha 06.30 PM Headlines ABP Majha 04 July 2024 Marathi News ABP MajhaTeam India in Delhi : T20 World Cup च्या विजयानंतर टीम इंडिया भारतात, विमान दिल्लीत लँडTop 100 Headlines Superfast News 6AM 04 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
Embed widget