Sugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special Report
Sugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special Report
उसाला आलेले हे तुरे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कारखानदारांच्या काळजीचे कारण बनले आहेत. या तुऱ्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच दुहेरी नुकसान होतय. उसाच उत्पादन घटून शेतकऱ्याला फटका बसतो. तर साखर उतारा कमी झाल्याने शेतकरी आणि कारखानदार दोघांचही नुकसान होतय. राज्यात सर्वात मोठा उद्योग म्हणून साखर कारखानदारीकडे पाहिलं जातं. उसाला लवकर तुरे आल्यान उताऱ्यामध्ये एक ते दीड टक््यांची घट झाली आहे. यावर्षी पावसाच प्रमाण रेगुलर पेक्षा थोडं जास्त झालेल आहे आणि ते होत असताना ज्यावेळी ऍक्चुली पाऊस नको आहे. पाऊस थांबला पाहिजे आणि स्वच्छ आणि कडकडीत ऊन पडलं पाहिजे ज्याच्यामुळे उसाची वेजिटेटिव ग्रोथ म्हणतो ते वाढते. महाराष्ट्रातील उसाचा हंगाम जेमतेम 30 दिवस राहिला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा उसाचा सर्वात मोठा पट्टा, त्यापैकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात साखरेच उत्पादन सर्वाधिक होत. या भागातील उसाचा उतारा साधारणतः 11.30 टक्के इतका होत असतो. मात्र पावसाच प्रमाण जास्त आणि ढगाळ वातावरण यामुळे उतारा 9.94 इतक्या मोठ्या. प्रमाणात घसरला एकरी 12 ते 13 टना उसाच उत्पादन घटलेला आहे. दुसऱ्या बाजूला रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे. पावसाळ्यामध्ये तनाच नियंत्रण करता आल नाही शेतामध्ये तन प्रचंड वाढलेला आहे आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आता परवडण्याच्या पलीकडे गेलेली आहे. साखरेचा उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागतोय. पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे उसाच्या शेतीमध्ये जास्त वेळ पाणी साचून राहतं. याचाही फटका शेतकऱ्यांना बसतोय. उत पण वजनाला थोडं कमी बसते. बाकी काय इतर काय? कशामुळे? पोसवल पोसवल की तुराय पडतोयला. पोसल्यानंतर. साखर कारखाने, गेल्या वर्षी राज्यात उसाचा उतारा 11.30 इतका. या वर्षी राज्यात साखरेचा उतारा 9.54 टक््यांवर आलाय. गेल्या वेळी उसाच गाळप 1063 लाख टन इतक झाल. यंदा आतापर्यंत उसाच गाळप केवळ 673 लाख टन इतक झाल. गेल्या वर्षी 110 टन साखरेच उत्पादन झालं होतं. यावेळी आतापर्यंत साखरेचे उत्पादन 64 लाख टन इतक झाले. साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानीय. जी परिस्थिती महाराष्ट्रात. तीच परिस्थिती देशात पाहायला मिळते, त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होऊन साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.























