एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: अरे ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात नाही झाली, सुरुवात झाल्यावर बघा तुमचा कसा बँड वाजतो, उद्धव ठाकरेंचा इशारा  

Uddhav Thackeray : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटी निवडणुकीत पराभवानंतर आज शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटी निवडणुकीत पराभवानंतर आज शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं.या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही. पराभव हा कायमस्वरूपी नसतो. पुढच्या वेळेस आपण अधिक जोमाने, ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू." 

ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बेस्टशी संबंधित प्रश्न, कर्मचारी आणि प्रवाशांच्या अडचणी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन केलं. समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहाणं आणि नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवत रहाणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत बेस्टच्या कामकाजात सुधारणा, सेवा गुणवत्ता आणि कर्मचारी वर्गाच्या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली.

एका पराभवातून खचणारा नाही : उद्धव ठाकरे

तुमची काम करण्याची जिद्द आणि निष्ठा महत्वाची फार महत्त्वाचं असतं. शिवसेनेनं यापूर्वी कमी वादळं आणि कमी संकटं पाहिली नाहीत असं नाही. शिवसेनेनं  पाहिलेल्या वादळांना आणि संकटांना शिवसैनिक म्हणून तुम्ही उतर दिल आहे. बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही पण बेस्टच काय होईल याची काळजी आहे. आपलं सरकार असतं बेस्टला वैभवापर्यंत नेलं असतं. गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे सर्वाना कळलं आहे.  कागदावर सत्ता कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते हे तुम्ही दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.   

बेस्टची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. महापालिका, बेस्ट, एसटी यातील कर्मचारी निवृत्ती होतील, तशा जागा कंत्राटी तत्वावर भरल्या जात आहे. कामगार अस्थिर राहिले तर ते स्थिर राहतात. नेहमी तुम्हाला चिंताग्रस्त ठेवतायत उद्या काय यावर ठेवतायत, लटकती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवतायत. त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम बेस्ट कामगार सेना करते, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले, काल परवा झालेला पराभव याची कारण काहीही असतील,एका पराभवातून खचणारा मी नाहीये, पराभवाचं पुन्हा विजयात रुपांतर करण्याची जिद्द तुमच्यामुळं माझ्यात आहे. निष्ठूरपणानं बळकावण्याचं काम सुरु झालं आहे. पंतप्रधान आपला, मुख्यमंत्री आपला पाहिजे, महापौर आपला पाहिजे, बेस्टमध्ये ड्रायव्हर आपला पाहिजे. घ्यायचं असेल तर न्यायपद्धतीनं घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

मत चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे,बोगस मतदान करायचं आणि आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे, असं मिरवायचं. याला लोकशाही म्हणत नाहीत, त्याला चोरशाही म्हणतात. मला चिंता आहे मुंबईवरचा मराठी ठसा याची, असंही ठाकरेंनी म्हटलं. कदाचित बेस्ट अदानीच्या हातात देतील, एअरपोर्ट दिलं, मोनो अनिल अंबानीकडे दिलंय. बेस्ट ही माझ्या शहराची रक्त वाहिनी आहे. एसटी राज्याची रक्तवाहिनी आहे.प्रत्येकाच्या घराजवळ जाणारी बेस्ट आहे. मी स्वत: बेस्टनं प्रवास केलेला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

मी स्वतः बेस्टने प्रवास करणारा आहे शाळेत असताना कॉलेजला जाताना प्रवास केला आहे, तुंबलेल्या पाण्यातून बेस्ट कशी काढली हे मी पाहिली आहे.मी मुख्यमंत्री असताना दोन तीन डेपोच नुतनीकरण केलं होतं. कर्मचारी माणसं आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आपली बेस्ट कामगार सेना आहे.आता चांगलं काम केलंत, पगार दिला बोनस देण्याची परिस्थिती आहे की नाही माहिती नाही, सरकार यांचं आहे पण लोकांना द्यायला पैसा नाही,न्याय हक्काची लढाई करणारा माणूस हा बेस्ट कामगार सेनेचा आहे म्हणून मला बेस्ट कामगार सेना महत्वाची वाटते.तीन नवे दिलेत म्हणजे जुने काढले नाहीत. काही ठिकाणी बदल करावे लागतात. बदल केले म्हणजे संघटना वाढणारच आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  

मुंबई महाराष्ट्राने मिळवली पण त्या मुंबईत मराठी माणसाला स्थान नव्हतं. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली.मुंबईत मराठी माणसांनी हिंदूंना वाचवलं. आम्ही अस्सल मराठी बोलणारे, कट्टर कडवट राष्ट्राभिमानी हिंदू आहोत.   कालच्या निवडणुकीत बेस्टच्या कामगारांनी शिवसेनेच्या पॅनेलला मतदान का केलं नाही हे एकमेकांमध्ये बोला. दाखवलं काय गेलं ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड अजून सुरुवात नाही झाली, सुरुवात झाल्यावर बघा तुमचा कसा बँड वाजतो. ठाकरे ब्रँड म्हणजे काय आपल्या राज्यातील मराठी हिंदूंसाठी आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला लढायची काय खाज आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
Embed widget