एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली, अजूनही लोकलला तुडूंब गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. कारण, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेले नसल्याने अजूनही लोकलच्या प्रवाशांची संख्या आधी इतकीच आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून देखील अनेक खाजगी कंपन्यांनी अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेले नाही. त्यामुळे अजूनही लोकल रेल्वेच्या प्रवाशांची संख्या आधी इतकीच बघायला मिळते आहे. असे असल्यास कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी कशी होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांना कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये बोलवण्याचा सल्ला दिला. केवळ पन्नास टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावे किंवा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. 

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला खाजगी कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे लोकल मधील प्रवाशांची संख्या. खरेतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, संख्या तितकीच आहे जितकी मार्च महिन्यामध्ये होती. 

दर दिवशी मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी 

  • जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 13 लाख प्रवासी. 
  • फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कालमर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 ते 17 लाख प्रवासी 
  • मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज तब्बल 20 लाख प्रवासी 
  • मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 20 ते 21 लाख प्रवासी 
  • 1 एप्रिलला - अंदाजे 21 लाख प्रवासी. 

दर दिवशी पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी 

  • जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 10 लाख प्रवासी, 
  • फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काल मर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 लाख प्रवासी 
  • मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज अंदाजे तब्बल 17 लाख प्रवासी 
  • मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 16 ते 17 लाख प्रवासी 
  • 1 एप्रिलला - अंदाजे 16 लाख प्रवासी

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की प्रवाशांच्या संख्येत कुठेही कमी झालेली नाही. म्हणजेच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसारखे पर्याय अजूनही सुरु केलेले नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांनी मागणी करून देखील कंपन्या ही मागणी ऐकायला तयार नाहीत. 

मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये कोविड 19 रुग्णांची संख्या वाढल्याचे महत्त्वाचे कारण लोकल मधील प्रवाशांची वाढलेली संख्या असे सांगण्यात आले. मात्र, खाजगी कंपन्यांनी जर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केलीच नाही तर लोकल मधील प्रवासी संख्या देखील कमी होणार नाही.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Embed widget