एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : भाजपवर 'संपर्क फॉर समर्थन'ची वेळ का आली?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जाणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ही भेट होणार आहे.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जाणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ही भेट होणार आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमधले संबंध टोकाला पोहोचले असताना ही भेट होत आहे. सत्तेत येऊन चार वर्षे उलटून गेल्यानंतर आता हे संपर्क फॉर समर्थन अभियान भाजपला का सुरु करावंसं वाटलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. संपर्क फॉर समर्थन काय आहे? मुंबईत सहा जून रोजी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अमित शाह सात जूनला अकाली दलाच्या प्रकाशसिंह बादल यांना चंदीगढमध्ये भेटणार आहेत. इतके दिवस मोदी-शाहांची भाजप शिवसेनेला कुठलाच भाव द्यायला तयारी नव्हती, मग अचानक असं काय झालं की त्यांना आपल्या मित्रपक्षांशी संपर्क करुन त्यांचं समर्थन मागावंसं वाटलं? भाजपच्या या बदलत्या रुपाचं उत्तर आहे संपर्क फॉर समर्थन अभियानात. हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न. एनडीएतील पक्षांसोबत संपर्क साधण्याची वेळ कशामुळे? दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात भाजप-संघाची मंथन बैठक संपली, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे अभियान सुरु झालं. आत्तापर्यंत अमित शाहांनी या अभियानांतर्गत देशाचे माजी लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग, घटनातज्ञ सुभाष कश्यप, माजी न्यायमूर्ती लाहोटी, क्रिकेटपटू कपिल देव, योगगुरु रामदेवबाबा यांची भेट घेतली. पण याच अभियानांतर्गत ते एनडीएच्या घटकपक्षांनाही भेटत आहेत हे थोडंसं मजेशीर आहे. कारण, चार वर्षे जे मुळात तुमच्यासोबत सरकारमध्येच आहेत, त्यांना आता संपर्क करण्याची आठवण होऊन त्यांच्याकडेच समर्थन मागण्याची वेळ का आली? असाही प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे विरोधकांची एकजूट वाढत चालली आहे. कर्नाटकात त्यामुळेच शंभरपेक्षा जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची मैत्री आपल्या जागांमध्ये लक्षणीय कपात करेल, अशी भीती भाजपला सतावत आहे. शिवसेना विरोधात लढली तर काय होईल, आपल्याला किती घाम गाळावा लागेल याची चुणूक पालघरच्या निवडणुकीने दाखवून दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या घटकपक्षांना पुन्हा चुचकारायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. अभियानातून पक्षाची विचारसरणी ठसवण्याचा प्रयत्न? संपर्क फॉर अभियानात भाजपचा मुख्य फोकस आहे बौद्धिक वर्तुळावर. विशेषतः या वर्तुळावर डाव्या विचारांचा प्रभाव अधिक आहे. सरकारविरोधात जास्तीत जास्त ओरड करणारा, संघाच्या विचारसरणीला घातक मानणारा हाच वर्ग आहे. चित्रपट कलावंत, साहित्यिक, न्यायमूर्ती, प्राध्यापक अशा वर्गामध्ये भाजपला ताकदीचे उजवे समर्थक मिळत नाहीत. त्यामुळेच कदाचित या माध्यमातून आपली विचारसरणी ठसवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न आहे. संबंधित बातमी : अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली : संजय राऊत माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपच्या वाटेवर?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
ज्याची भीती होती, तेच होतंय...; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
NEET Paper Leak Latur Crime News: नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थीनीने जीवन संपवलं; वडिलांच्या जबाबानंतर पोलिसही चक्रावले, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थीनीने जीवन संपवलं; वडिलांच्या जबाबानंतर पोलिसही चक्रावले, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Maharashtra Live blog updates: चालत्या ट्रक मधून शेळ्या लंपास; सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Embed widget