एक्स्प्लोर

अजित पवारांचा खोटारडेपणा उघड, पंढरपुरातील मतदारांनी खोटारड्यांना जागा दाखवावी प्रकाश आंबेडकरांची टीका

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, अजित पवार यांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. सभागृहात स्थगिती देतात आणि पुन्हा वीज तोडणी होते.

सोलापूर : वीजबिलाबाबत अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. विधानसभेत त्यांना घेराव होऊ नये म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज तोडणार नाही असे आश्वासन दिले. मात्र शेवटी पुन्हा वीज तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी., असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते आज सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावी प्रकाश आंबेडकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर देखील टीका केली. 

नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीज बील माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र राऊत यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाही. ते काँग्रेसचे दुबळे मंत्री त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाही. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान वीज तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केले. "कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, किती गुन्हे दाखल होतेत होऊ द्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत ?" असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीज बील तोडणीला विरोध दर्शवला. 

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली - प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरीमा घालवली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान केवळ 1 किंवा 2 वेळा जातात. मात्र बंगालच्या निवडणुकींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 17 वेळा जाऊन आले आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभणारे नाही. गल्लीतला कार्यकर्ता देखील आजकाल पंतप्रधानावर आता टीका करु लागला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे. भारतीय जनता पार्टीने याचा विचार केला पाहिजे." अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच चीनने सीमेवरुन आपले सैन्य अद्याप मागे घेतलेले नसताना त्यांना गुंतवणुकीसाठी कशी काय परवानगी देण्यात आली याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असा सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. "पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या पंढरपुरात बैठक होणार आहे. ही निवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत." अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
IND vs AUS : अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11
अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Hostage Crisis: रोहित आर्य पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार, मध्यरात्री पुण्यात अंत्यसंस्कार
Pune Gang War: आंदेकर टोळीचा सूड? आरोपी Sameer Kale च्या भावाची कोंढव्यात गोळ्या झाडून हत्या
Pune Gang War: 'पोलीस टोळीयुद्ध थांबवण्यात अयशस्वी', Ganesh Kale हत्येनंतर पुणे हादरले!
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 01 Nov 2025 | ABP Majha
Farm Loan Waiver: 'सरकारचं काम फक्त कर्जमाफी आणि नुकसान भरपाई देणंच आहे का?', पटेलांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
IND vs AUS : अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11
अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Embed widget