एक्स्प्लोर

तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच, काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य नाही : संजय राऊत  

ममता बॅनर्जी यांनी नुकतीत मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. बॅनर्जी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले.

मुंबई : देशात काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली युपीए आहेच कोठे? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबईत (mumbai) येऊन उपस्थित केला. बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी "काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही," असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (prashant kishor ) करतात. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाना साधला. शिवाय काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही बॅनर्जी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. हा वाद सुरू असतानाच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्यावर निशाना साधला आहे. याबरोबरच आज शिवसेनेचे (shiv sena)खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी या प्रकरणावरून माध्यमांसोबत संवाद साधत "तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच होणार आहे. काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य असल्याचे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी नुकतीत मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. बॅनर्जी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले. यातच त्यांनी "देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आहेच कोठे?" असा प्रश्न उपस्थित करत वाद ओढावून घेतला. बॅनर्जी यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांनी तर प्रत्यूतर दिलेच परंतु, सध्या महाष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनातून बॅनर्जी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर निशाना शाधला आहे. त्यानंतर त्यांनी आज सकाळी माध्यमांसोबत या प्रकरणावर संवाद साधला. 

"ममता बॅनर्जी या देशाच्या मोठ्या नेत्या आहेत. भाजप विरोधात सुरू असल्या लढाईत त्या महत्त्वपूर्ण यौद्धा आहेत. युपीए कुठे आहे? हे ममता बॅनर्जींचे विधान तसं पाहिलं तर योग्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितले आहे की, यूपीएला मजबूत करावे लागेल, यूपीएने आणखी आक्रमक झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी तर हे सुद्धा सांगितले आहे की, ज्याप्रकारे युपीए नाही तर दुसरीकडे एनडीए पण नाहीये." असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

जेवढ्या आघाड्या जास्त तेवढा भाजपला फायदा
"देशात जेवढ्या जास्त आघाड्या होतील त्याचा फायदा भाजपलाच जास्त होणार आहे. त्यामुळे जास्त आघाड्या होणे योग्य नाही तसेच काँग्रेसला सोडून इतर कोणता पक्ष आघाडी करू पाहात असेल तर सध्याच्या राजनीतीसाठी हा विचार योग्य नाही. काँग्रेसला सोबत घेऊन आपण काम केले तर त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे आम्ही आधीच सांगितले आहे की, अनेक पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या युपीएलाच आणखी मजबूत बनवले पाहिजे. काँग्रेससोबत अनेकांचे मतभेद असू शकतात. महाराष्ट्रातसुद्धा आमचे मतभेद आहेतच परंतु, आम्ही एकमेकांना साथ देऊन सत्ता चालवत आहोत." असे संजय राऊत यांनी सांगितले.  

 
शरद पवार यांनीसुद्धा याआधी सांगितले होते
संजय राऊत म्हणाले, "युपीए कुठे आहे? अशी सध्या सर्चा सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात जे यूपीए आहे ते सुद्धा एक यूपीएचे प्रतीकच आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबाबत असे विधान केले असले तरी आता याबाबत सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करावी लागणार आहे. ममता बॅनर्जी यांनी जो विचार ठेवला आहे त्याबाबत त्यांचा आम्ही आदर करतो. याआधीही शरद पवार यांनी सांगितले आहे की, 'आपण एक पर्याय तयार करू. त्यावर विचार करू आणि मग नेता कोण असणार हे ठरवले जाईल." 

 "मुंबईमध्ये आमची ममता बॅनर्जींसोबत चर्चा झाली तेव्हा सुद्धा आपण सर्वांना सोबत घेऊनच पुढे गेले पाहिजे यावर चर्चा झाली होती. काँग्रेसला सोडून इतर कोणती आघाडी बनवली तर मतांची विभागणी होईल आणि याचा फायदा भाजपला होईल. 
 सध्या कोणाचेच सदस्य नसलेल्या अकाली दल आणि इतर काही पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. सोनिया गांधी, शरद पवार, प्रियांका गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते हे काम करू शकतात."असे मतही खासदार राऊत यांनी मांडले. 

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आम्हीच बोललं पाहिजे. कारण त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विचार पुढे नेले. या गोष्टीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाईज केलं नाही. सावरकर हे आमचे आदर्श आहेत आणि आम्ही या आधी सुद्धा अनेकदा म्हटले, सावरकर हे भारतरत्न आहेत सरकारशी काय समस्या आहे की त्यांना भारतरत्नाने सन्मानित केले जात नाहीये. असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.  

  

Shiv Sena on Mamata Banerjee :ममता यांचं राजकारण सध्याच्या 'फॅसिस्ट' राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखं , पाहा व्हिडिओ


संबंधित बातम्या

शिवसेनेचा 'सामना'तून ममता दीदींवर निशाणा, यूपीएचं कौतुक तर काँग्रेसला सल्ला

Mamata Banerjee Meets Gautam Adani : ममता बॅनर्जीं आणि गौतम अदानींची भेट; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा

 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget