एक्स्प्लोर

Gram Panchayat Election : सरपंचपदाची माळ अपशकुनी? साताऱ्यातील राजपुरेत मृ्त्यूच्या भीतीनं सरपंचपदाला ना ना!

राजपुरे गावात जी व्यक्ती सरपंच होते त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या गावातील ग्रामस्थांमध्ये ठासून भरली आहे.

सातारा : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या मध्ये सरपंच कोण होणार यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अनेक गावांमध्ये सध्या बिनविरोध निवडणुका होऊन सरपंच पद निवडले गेले. मात्र सध्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे राजपुरे गावाची चर्चा काही औरच म्हणावी लागेल. या गावात सरपचं पद स्वीकारण्यास कोणीही तयार नाही.

एका बाजूला सरपंच पदासाठी लाखो रुपये खर्च करून घेऊन पद मिळवतात तर अनेक जण निवडणूक लढवताना लाखो रुपये खर्च करून हे पद मिळवण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला अशी परिस्थिती आहे तर दुसर्‍या बाजूला म्हणजेच सातारा जिल्ह्यातील पाचगणी तालुक्यातील राजापूर या गावात जवळपास गेले पाच टर्म कोणीही सरपंच होण्यासाठी तयार नाही. सर्व कारभार हा उपसरपंच संभाळत आहे. त्याचे कारण मात्र सर्वांना धक्का देणारे आहे. जो सरपंच होतो त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या राजापुरे गावातील ग्रामस्थांमध्ये ठासून भरली आहे.

सत्वशिला राजपुरे वय 42 वर्ष,  अशोक राजपुरे वय 50, किसन राजपुरे वय 52 ,रामचंद्र राजपुरे वय 55 यांचा  सरपंच पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर मृत्यू झाला. सरपंच पदाची माळ गळ्यात पडली आणि यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही साखळी ग्रामस्थांनी एक वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवली. सरपंच पद स्वीकारल्यानंतर मृत्यू होतो अशी चर्चा गावात सगळीकडे सुरू झाली. नुसती चर्चाचं नाही तर गावातल्या कुठलाही व्यक्ती मी सरपंच होणार नाही अशा भूमिकेतूनच गावाला गेली पाच टर्म सरपंच नाही.

एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी सरपंच पदच नको असं म्हणत सरपंच पदही रिक्त ठेवायला चालू केलं आहे. उपसरपंच या गावचा कारभार आज पर्यंत संभाळत आले आहे. आता जर का या विषयी बाहेर लोकांना सांगितलं तर लोक चेष्टा करतील या भीतीने ग्रामस्थांनी आजपर्यंत यावरती कधीच भाष्य केले नाही. युवकांनी मात्र यंदाच्या वर्षी सरपंच करायचं म्हणून प्रबोधन चालू केलं आहे.

नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावातली एक महिला सरपंच पदासाठी तयार झाली. त्यांनी यंदा गावाला तसे सांगितले आहे. खरं तर या महिलेचा कौतुक म्हणावं लागेल कारण चाळीस वर्षापासून कधीच या गावांमध्ये निवडणूक झाली नव्हती मात्र यंदा निवडणूक झाली. राजापूर हे गाव तसं पाचगणी पासून दुर्गम भागातील पहिल्या टोकावर असलेलं गाव आहे. राजपुरे गावापासून पुढे कोणत्याही गावाला रस्ता नाही. शेवटचं गाव दुर्गम असले तरी गावाचा म्हणावा असा विकास झाला नाही. गावच्या या अंधश्रद्धेचा विकासकामांना आजपर्यंत फटका बसला आहे.

पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रात आणि जिथे अंधश्रध्देच्या विचारांची धारणा घेत साता-यात अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीची सुरवात झाली अशा सातारा जिल्ह्यातच अशा पद्धतीची ही अंधश्रद्धा असणं म्हणजे गंभीर बाब आहे.

जरी एका महिलेने हे सरपंच पद स्वीकारण्याचं धाडस दाखवल असलं तरी या गावातील प्रशासकीय यंत्रणेचा अभाव हा प्रखरतेने जाणवत आहे. आता जिल्हाधिका-यांनी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी गावात बैठक घेऊन गावाचं प्रभोधन करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

Gram Panchayat Election : सत्तेसाठी कायपण! नांदेडमध्ये सासू विरुद्ध सून तर पित्याच्या विरोधात पुत्र मैदानात!

बिनविरोध करायची असेल तर गावाच्या एकीने व्हावी प्रलोभनाने नको, वाखरी ग्रामस्थांच्या जळजळीत प्रतिक्रिया

Maharashtra Gram Panchayat Election : आमदार निलेश लंकेंची भन्नाट आयडिया, पारनेरमधील 30 ग्रामपंचायती बिनविरोध

Gram Panchayat Election | पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटलांची निवडणुकीतून माघार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Embed widget