एक्स्प्लोर

सांगलीचे 'मांझी', चिमणीच्या साथीने 43 फूट विहिरीतून गाळ काढला

सांगली: स्वत:च्या हातांनी डोंगर फोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझींच्या कर्तृत्त्वाला देशाने सलाम केला. तसंच कर्तृत्व वाशिममधल्या एका बहादराने करुन दाखवलं. बापूराव ताजणे यांनी एकट्याने विहीर खोदली. आता इकडे सांगलीतही दोन जिगरबाज 'मांझी'नी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.   उत्तम पाटील, हणमंत पाटील....सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरेधरण गावातले हे जिगरबाज भाऊ आज अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. डोंगराला नमवणाऱ्या मांझीप्रमाणे या दोघांनीही कोणाचीही मदत न घेता आपल्या 43 फूट विहिरीतील तब्बल 10 फुटांचा गाळ स्वच्छ केला. सांगलीचे 'मांझी', चिमणीच्या साथीने 43 फूट विहिरीतून गाळ काढला दुष्काळाला हरवण्याचा ध्यास   रेठरेधरण हे वाळवा तालुक्यातील आठ- नऊ हजार लोकवस्तीचं गाव. गावात उत्तम आणि हणमंत पाटील या दोन जिगरबाज सख्ख्या भावांचं वास्तव्य. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरवले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलत त्यांनी शेती कसायला सुरुवात केली. पाऊसमान चांगलं होतं तोपर्यंत शेतीतून उत्पन्न चांगलं झालं. मात्र  पावसाचे गणित बिघडले आणि एकमेकांच्या हातात हात घालून शेती करणाऱ्या या दोन भावांच्या संसाराचे गणितदेखील बिघडले.

संबंधित बातमी : वाशिमचा मांझी… शेजाऱ्यानं पाणी नाकारलं म्हणून ‘त्यानं’ हाताने विहीर खोदली!

हाताने खणलेल्या विहिरीचं पुनरुज्जीवन   दुष्काळानं शेती करपून गेलेली...पाण्याचा टिपूस नाही. शेतातून पायलीभर धान्य मिळाले नाही.  हाताला काम नाही. अशा परीस्थितीत या दोन बंधूसमोर संकटाचे मळभ दिसू लागले. मात्र परिस्थितीला शरण जातील आणि हातात हात घालून बसतील ते हे पाटील बंधू कसले. सांगलीचे 'मांझी', चिमणीच्या साथीने 43 फूट विहिरीतून गाळ काढला अशावेळी हातावर हात धरुन बसणं यांना मान्य नव्हतं. शेतातील 1986 साली हातानेच खणलेल्या जुन्या विहिरीला पुनरुजीवित करण्याचा ध्यास घेऊन, दोघे बंधू टिकाव, खोरे घेऊन 43 फूट विहिरीत उतरले. त्यांनी विहिरीतून एक-एक पाटी गाळ काढण्यास सुरुवात केली. कोणत्याही यंत्राशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय या भावांनी आपल्या 43 फूट विहिरीतून तब्बल 10 फूटांचा गाळ काढला.   चिमुकल्या चिमणीची साथ   दोन्ही बंधू सकाळी ७ वाजल्यापासून गाळ काढायला सुरुवात करायचे. त्यांचा हा  दिनक्रम  महिनाभर सुरु होता. गाळ काढताना अनंत अडचणी येत होत्या. या कामामध्ये त्यांना सोबत होती ती एका चिमणीची.   विहिरीमध्येच घरटे असलेल्या या चिमणीला पाणी मिळत नव्हतं. या बंधूंनी विहिरीतील एका बारीक झऱ्यातून येणारे थेंब थेंब पाणी चिखलाने अडवून, ते चिमणीला मिळेल, अशी सोय केली. सांगलीचे 'मांझी', चिमणीच्या साथीने 43 फूट विहिरीतून गाळ काढला आधी विहिरीत फक्त कुदळ, फावड्याचा आवाज घुमायचा. मात्र आता चिमणीचा प्रसन्न करणारा चिवचिवाट ऐकायला येऊ लागला होता. या आवाजाच्या साथीने पाटील बंधूंनी 24 दिवसात 10 फूट गाळ काढून विहीर पुनरुज्जीवित केली.   या दोन्ही जिगरबाज भावांची जिगर पाहून दुष्काळही दोन पावलं मागे हटला.

संबंधित बातम्या

वाशिमचा मांझी… शेजाऱ्यानं पाणी नाकारलं म्हणून ‘त्यानं’ हाताने विहीर खोदली!

महत्त्वाच्या बातम्या

रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget