एक्स्प्लोर

कुठल्या दिशेने जायचं ते मी ठरवलंय, सदाभाऊंचा राजू शेट्टींना थेट इशारा

मुंबई : “मी मंत्री झाल्यापासून अनेकांच्या मनात असूया निर्माण झाली आहे. म्हणून मगरीसारखे ते अश्रू ढाळत आहेत. मी ठरवलं आहे, कुठल्या दिशेने जायचं ते”, असे म्हणत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे. “मी जीवनात अनेक वादळं पाहिली आहेत आणि अनेक वादळं भविष्यात येणार आहेत. ती पार करुन पुढे जाऊ. कोणीही सत्तेतून बाहेर पडू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथं बसलोय. मिळून मिसळून काम करावं.”, असे म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टी यांना सुनावलं आहे. आत्मक्लेश यात्रेवर सदाभाऊ काय म्हणाले? “मी सरकारमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. मला राज्यताल्या शेतकऱ्यांनी उभं केलं आहे. मी काय अवतारी पुरुष नाही की अचानक प्रकट झालोय. मी लहानपणापासूनच चळवळीत आहे.”, असे सदाभाऊ म्हणाले. शिवाय, “कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असून, मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकाऱ्यांशी संवाद साधणारा मंत्री आहे. पारावर, कट्ट्यावर, चौकात जनता बोलतेय त्या भाषेत त्यांचे प्रश्न मांडायला मी सरकारमध्ये आलोय.”, असे आत्मक्लेश यात्रेवर बोलताना सदाभाऊ म्हणाले. शेतकरी संपावर सदाभाऊ खोत काय म्हणाले? “उद्यापासून संपावर जाणाऱ्या विविध शेतकरी संघटना आणि नेत्यांशी सरकार चर्चा करत आहे. संवादाच्या माध्यमातून आम्ही यावर निश्चित तोडगा काढू”, असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला. “पूर्वीचे लोक चर्चा करतच नव्हते. सत्तेच्या बळावर आंदोलनं मोडीत काढत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांचे बळी गेले. शरद जोशींच्या आंदोलनात 36 शेतकरी बळी गेले. ऊस आंदोलनात 2, मावळला 4 शेतकऱ्यांचे बळी गेले. पण आम्हाला असं करायचं नाही.”, असेही सदाभाऊ म्हणाले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : सदाभाऊ “मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की, शेतकरी संघटनेतील प्रतिनिधी आणि सरकारी प्रतिनिधी अशी एक संयुक्त समिती गठीत करुन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत धोरण ठरवू. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ही सत्ता शेतकऱ्यांनी मिळवून दिलेली आहे.”, असं आश्वासनही सदाभाऊंनी दिले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget