एक्स्प्लोर

मूळचा सांगलीचा, घरफोड्या नाशिकमध्ये, अन् नेपाळमध्ये रिसॉर्ट

नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे.

नाशिक : नाशिकमध्ये घरफोड्या करुन नेपाळमध्ये स्थायिक झालेल्या गणेश भंडारे या एका श्रीमंत चोराच्या मुसक्या आवळण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मूळचा सांगलीचा असलेल्या गणेशने नेपाळमधील एका महिलेशी लग्न केले असून, चोरी करण्यासाठी गणेश महाराष्ट्रात येतो आणि चोरीच्या पैशातून तो रिसॉर्ट उभारत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. 30 ऑक्टोबर 2016 रोजी नाशिकच्या टागोरनगरमध्ये घरफोडी करुन गणेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो नेपाळमध्ये लपून बसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राज्य गुन्हे अन्वेषन विभाग पुणे यांच्यामार्फत गणेशला प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरलपोलकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता. गणेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, 3 घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेला आणि मुंबईमधील एका सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करणाऱ्या दीपक पोखरकर या व्यावसायिकाला विक्री केलेला 13 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये 547 ग्रॅम सोन्याचा समावेश असून दीपकला देखील अटक करण्यात आली आहे. गणेश भंडारेच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत असून, त्याने अशाच प्रकारे चोरीच्या पैशातून कुठे कुठे आणि किती संपत्ती गोळा केली आहे, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget