एक्स्प्लोर

एमपीएससीचा अजब न्याय, गुण मिळवूनही मागासवर्गीय मुलींना नोकरी नाही!

महिला आणि त्यात मागासवर्गीय म्हणून जास्त अन्याय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग करत असल्याची भावना या परीक्षार्थींमध्ये आहे.

मुंबई : गेल्या चार वर्षात मागासवर्गीय मुली, ज्या खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देत आहेत, त्यांना नोकरी डावलण्याची अनेक प्रकरणं झाली आहेत. कारण, एमपीएससीने त्यांना त्यांची जात विचारली. त्यातील काही मुलींनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पण शेतकऱ्यांच्या या मुलींकडे वकिलांना द्यावे लागणारे पैसे नसल्यामुळे अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. महिला आणि त्यात मागासवर्गीय म्हणून जास्त अन्याय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग करत असल्याची भावना या परीक्षार्थींमध्ये आहे. वर्षा बांगर नागपूरहून मुंबईत खेट्या घालत आहे. गेले तीन वर्षे एमपीएससीची परीक्षा देत आहे. भटक्या जमातीतील वर्षाला पहिले दोन वर्षे संधी मिळाली नाही. कारण, भटक्या जमातीच्या प्रवर्गात जागा नव्हत्या. म्हणून तिने खुल्या प्रवर्गातून अर्ज केला. एसटीआय परीक्षेत तिला 122 मार्क मिळाले. खुल्या प्रवर्गात महिलांना कट ऑफ 119 होता. तसेच एक्साईज इन्स्पेक्टर परीक्षेत 132 मार्क मिळाले. कट ऑफ 115 चा होता. मार्क जास्त असूनही नोकरी डावलली, कारण तिची जात विचारण्यात आली. एमपीएससीने जात विचारुन खुल्या प्रवर्गातून संधी दिली जाणार नाही असं सांगितलं. असं असेल तर आम्ही महिला नाही असं प्रमाणपत्र एमपीएससीने द्यावं अशी टीका परीक्षार्थींना केली आहे. सुवर्णा मोटे या परीक्षार्थीबरोबरही असंच झालं. PSI साठी तीन वर्षे परीक्षा दिल्या. धनगर जमातीसाठी जागा निघाली नाही म्हणून खुल्या प्रवर्गातून अर्ज केला. तिला तब्बल 220 मार्क मिळाले. खुल्या प्रवर्गात महिलांचा कट ऑफ 190 चा होता. आवश्यक तेवढे गुण होते तरीही नोकरी डावलण्यात आली, कारण तिची जात मध्ये आली. अशा अनेक मुली आज न्यायासाठी झगडत आहेत. काही कोर्टात गेल्या तेव्हा त्यांना न्याय मिळाला. पण शेतकऱ्यांच्या या मुली वकिलांची 50 हजार फी देऊ शकत नसल्यामुळे कोर्टात जाऊ शकत नाही. एमपीएससीच्या या कारभाराबाबत आमदार हरीभाऊ राठोड यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार जातीयवादी असून मागासवर्गीय, त्यात महिला परीक्षार्थींचा हक्क डावलण्यात येत आहे. मंत्र्यांकडे दाद मागितली तर कोणी लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केलाय. एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणतं. विद्यापीठांना अहिल्याबाईंचं नाव देतं. पण स्पर्धा परीक्षेत खुल्या प्रवर्गात मागासवर्गीय असूनही चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलींना नोकरीची संधी डावलली जात आहे... आणि गेले चार वर्षे या मुली न्याय मागत आहेत. पण कोणत्याही मंत्र्यांना यांच्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अधिवेशनात आंदोलन करण्याचा पवित्रा या परीक्षार्थींनी घेतला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Embed widget