एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांनाच ओएसडी करून टाका, नवाब मलिकांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस हे ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगत असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फडणवीस यांनाच ओएसडी करुन टाका असेही मलिक म्हणाले.

Nawab Malik : महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर एक महिन्यापूर्वी दबाव आणला आणि मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही, म्हणून ईडीची चौकशी मागे लावल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्यसभेच्या सभापतींना थेट पत्र लिहिलं आहे. या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे. माझं म्हणणं आहे की, त्यांना ओएसडी करून टाका. तेच रोज ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आमच्या अनेक मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा लावला आहे. मला ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की, त्यांनी राजकीय पक्षाच्या एजंटसारखे काम करू नये. आम्ही राज्यात आहोत लवकरच केंद्रात देखील येऊ असेही मलिक यावेळी म्हणाले. शरद पवार यांना देखील ईडीची नोटीस पाठवली होती. ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जेवढा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच क्षमतेने उभारून वरती येऊ. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकलेला नाही असेही मलिक यावेळी म्हणाले. केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांचे काय चालले आहे हे देखील आम्हाला माहित असल्याचे मलिकांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी ते काहीही करत आहेत. सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशी लावत आहेत. त्यांनी वाटतेय की आमचे नेते भिवून सरकारमधून बाहेर पडतील आणि आमच्यामागे येतील. पण त्यांचा हा गैरसमज असल्याचे मलिक म्हणाले. यातून सत्ता काबीज करता येमार नाही. संजय राऊत यांनी लिहलेली सर्व सत्य परिस्थिती आहे. ईडीचे काही अधिकारी राजीनामा देतात, त्यांना भाजप निवडणुकीसाठी तिकीट देते, अधिकारी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत असल्याचे ते म्हणाले.  5 वर्ष काय 25 वर्ष हे सरकार चालणार आहेत. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून सुरू असल्याचे मलिक यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget