एक्स्प्लोर

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीला त्याच्या मुलीची आणि पत्नीची आठवण येत आहे. त्यांना भेटण्यासाठी तो विनंती करत आहे.

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. न्यायालयाने आरोपीची न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी आज न्यायलयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे विक्की नगराळेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विक्की नगराळेविरोधात राज्यभरातील नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरोपीला सकाळीच 6 वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयीन कोठडीत पाठवताना पुढे गरज भासल्यास पोलीस कोठडी मागू, असं पोलिसांनी आज न्यायालयात सांगितलं आहे.

धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पोलीस कोठडीची मागणी का केली नाही?

न्यायालयीन कोठडी मागण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोपीची ओळख परेड साक्षीदारांमार्फत करुन घेणे. ही ओळख परेड करुन घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पोलीस कोठडीत आरोपी असताना ओळख परेड घेता येत नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठवून ओळख परेड घेतली जाणार आहे.

आरोपी विक्की नगराळेला येतेय मुलगी आणि पत्नीची आठवण

हिंगणघाटमध्ये एका लेकीला जाळणाऱ्या आरोपी विक्की नगराळेला आता त्याच्या लेकीची आठवण येत आहे. घटना घडण्याच्या 12 दिवस आधीच आरोपी विक्की मुलीचा बाप झाला होता. आता आरोपीला त्याच्या मुलीची आठवण येते आहे. मला माझ्या मुलीला आणि पत्नीला एकदा भेटू द्या, अशी विनंती तो पोलिसांना करत आहेत.

दरम्यान, आरोपीने घटनेसाठी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि शूज, पेट्रोलची बॉटल कापण्यासाठी वापरलेले कटर, आग लावण्यासाठी वापरलेलं लायटर हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शिवाय घटनेच्या वेळी आरोपीच्या खिशात फक्त 30 रुपये होते, ते देखील जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget