Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसतोय.... नाशिकहून दुबईला जाणारा कांदा बंदरातच अडकलाय...पश्चिम आशियात रमजानच्या दिवसात जळगावमधून मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जातात.. मात्र यंदा युद्धामुळे ते अशक्य होऊन बसलंय.. आणि जर युद्ध लांबलं तर यावेळी हापूस आंब्याची आखातवारी देखील रखडण्याची चिन्ह आहेत.. पाहुयात युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कशी संक्रांत ओढावली आहे ते...
म्हणून युद्ध नको... तर बुद्ध हवा....
युद्धामुळे कांद्याचा कंटेनरमधला मुक्काम वाढला
नाशिकमधला कांदा उत्पादक मोठ्या अडचणीत
जळगावच्या केळीची आखाती देशातली निर्यात ठप्प
रमजानमध्ये केळीला मोठी मागणी, पण युद्धामुळे गणित फिस्कटलं
युद्ध संपू दे... हापूस उत्पादकांचं देवाला साकडं
कृषीमालाची निर्यात रखडली, शेकडो कोटींचा फटका
एप्रिल उजाडताच दुबई, ओमान, बहारीन, कतार, इराण या देशातील खवय्यांना वेध लागतात ते..
आपल्या कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे..
सीझनमध्ये दिवसाला ६० ते ७० टन हापूस आखाती देशात पाठवला जातो
मात्र युद्ध जास्त काळ चाललं तर हापूसची निर्यात कशी करायची असा प्रश्न आत्तापासूनच निर्यातदारांना सतावतोय..
त्यामुळे आंब्याचा सीझन सुरू होण्याआधीच युद्धाचा दी एन्ड झाला पाहिजे, असं गाऱ्हाणं कोकणातला हापूस उत्पादक आणि निर्यातदार नक्कीच घालत असणार
प्रश्न फक्त कांदा, केळी आणि हापूसचा नाहीय..
तर इतर पश्चिम आशियातील देश हे इतर कृषीमालाची मोठी बाजारपेठ आहे
पण युद्धामुळे सगळ्याच कृषीमालाची आखाती देशात होणारी निर्यात ठप्प झाल्यामुळे दीडशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे..
आणि युद्ध जास्त काळ लांबल्यास हा आकडा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत
सोनं आणि चांदी आधीच सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट बनत चाललीय..
युद्धांचे संकेत मिळताच गुंतवणूकदार शेअर बाजारातून माघार घेत सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात..
त्यामुळे साहजिकच दोन्ही धातू पुन्हा एकदा विक्रमी दर गाठण्याची शक्यता अधिक आहे...
त्यामुळे लग्न असलेल्या घरांना बजेट पुढे मागे करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे..
All Shows
































