एक्स्प्लोर

भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याकडून SRT तंत्रज्ञानाचा वापर

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड पूर्ण केली आहे. एसआरटी तंत्रज्ञानामुळे भात लागवडीवर होणारा वारेमाप खर्च कमी होत आहे.

पालघर : पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात सध्या भातपेरणीचा मोसम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठीची लगबग सुरू आहे. मात्र, पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत वाडा तालुक्यातील सापणे बु. गावातील शेतकरी संजय तुकाराम भोईर यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान(एसआरटी) पद्धतीने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. संजय भोईर यांनी आपल्या शेतात मागील वर्षांपासून हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ते त्यात यशस्वी झाल्याने त्यांनी या वर्षी आपल्या चार ते साडेचार एकरच्या पूर्ण शेतीमध्ये एसआरटी पद्धतीने लागवड केली आहे. त्यांनी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व भट लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे.

एसआरटी पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी संजय भोईर यांनी दोन लोखंडाचे सांगाडे तयार केले आहेत. पहिल्यांदा ट्रॅक्टरने पूर्ण शेतीची उखळणी केल्यानंतर त्यांनी वाफे तयार करुन घेतले. लोखंडी सांगाड्याच्या सहायाने जमिनीत थोडे खड्डे तयार झाल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये 4 ते 5 पाच भाताचे दाणे टाकून त्यावर पुन्हा माती टाकली जाते. त्यामुळे बियाणे योग्य पद्धतीने जमिनीत पुरले जातात भात पेरताना दोन रोपांमधील अंतर 25 बाय 25 सेंटीमीटर व दोन रांगेमधील अंतर अर्धा फूट ठेवले आहे. त्यामुळे सर्व रोपं आणि सर्व रांगा सारख्या दिसतात. यामुळे आंतरमशागत करताना शेतकर्‍यांना त्रास होत नाही. त्यांनी आपल्या चार एकर जागेमध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून 10 माणसे कामाला घेतली असून चार साडेचार एकर जागेसाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. यासाठी फक्त 40 किलो बियाणे लागले आहे. विशेष म्हणजे भात लागवड करताना लागणारी मजुरांची चणचण यावर देखील त्यांनी मात केली आहे.

..अन् शेतकऱ्यांच्या पायाला भेगा का पडतात? याचा अनुभव मला आला : खासदार संभाजीराजे

या पद्धतीमुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत या पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा वाफे तयार केल्यास पुढील पाच वर्षे लागवड करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे दरवर्षी नांगरणी, लागवड, गवत काढणी यावर होणारा मोठा खर्च वाचतो. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करून पीक घेतल्यास याच शेतात रब्बी हंगामात दुसरे पीक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज नसल्याचे संजय भोईर यांनी सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली भात लागवड करावी, असे आवाहन संजय भोईर यांनी केले आहे. जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणार्‍या खर्चापेक्षा 50 टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपरिक लागवडीपेक्षा जास्त येते. शिवाय पिकांची रोग प्रतिकारशक्‍ती जास्त असते.

Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
Maharashtra Live blog updates: विधान परिषदेचा निकाल; कुठे कुणाचा विजयी गुलाल? वाचा सर्व अपडेट्स
Maharashtra Live blog updates: विधान परिषदेचा निकाल; कुठे कुणाचा विजयी गुलाल? वाचा सर्व अपडेट्स
Ratnagiri Accident News : भरधाव डंपरची जोरदार धडक; दुचाकीवरील महिला अक्षरशः हवेत फेकली गेली अन्....; हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
भरधाव डंपरची जोरदार धडक; दुचाकीवरील महिला अक्षरशः हवेत फेकली गेली अन्....; हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
राजेंद्र राऊतांच्या विजयानंतर जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचा नेताही सांगितला
राजेंद्र राऊतांच्या विजयानंतर जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचा नेताही सांगितला
Sangli Satara MLC Election: सांगली सातारा विधानपरिषदेत धैर्यशील कदमांचा विजय, पण जयकुमार गोरेंचा स्वत:च्या बालेकिल्ल्यात 'धैर्य' तोडणारा 'करेक्ट कार्यक्रम'! तब्बल शंभरावर मते फुटल्याचा दावा
सांगली सातारा विधानपरिषदेत धैर्यशील कदमांचा विजय, पण जयकुमार गोरेंचा स्वत:च्या बालेकिल्ल्यात 'धैर्य' तोडणारा 'करेक्ट कार्यक्रम'! तब्बल शंभरावर मते फुटल्याचा दावा
Bhaskar Jadhav and Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर म्हणाले, 'त्यांना Frustration आलंय'; आता भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर
मिलिंद नार्वेकर म्हणाले, 'त्यांना Frustration आलंय'; आता भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर
Video: ओमराजे निंबाळकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Video: ओमराजे निंबाळकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget