एक्स्प्लोर

मुख्यमंत्री एकटे पडलेत का? शिवसेनेची समजूत काढण्यात यश का येत नाही?

दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी थेट मतोश्रीचे दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण केल्या. कारण प्रश्न होता मोदींच्या प्रतिष्ठेचा. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचं चित्र आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी आहेत. कारण हा संघर्ष सुरू आहे मुख्यमंत्री पदासाठी. निवडणूक निकालापूर्वी आमचं ठरलंय म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता नेमकं काय ठरलं होतं हेच सांगता येत नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अडलेल्या शिवसेनेची समजूत काढण्यात फडणवीस यांना यश येत नसल्याचंच सध्या दिसतंय. याउलट 2014 ला सत्ता स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची टीम खंबीरपणे उभी होती. यामध्ये शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार कायम आघाडीवर असायचे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि वेळप्रसंगी नितीन गडकरी आपले संबंध वापरून मातोश्रीची नाराजी दूर करण्यासाठी पुढे सरसवायचे. मात्र सध्यपरिस्थितीत चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार सोडल्यास यापैकी एकही जण फडणवीस यांच्या टीम मध्ये राहिलेले नाहीत. काहींचा निवडणुकीत पत्ता कट झाला, तर काहींचा पराभव. नितीन गडकरींना तर राज्याच्या राजकारणात काहीच स्थान नसल्याचं सध्या चित्र आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी थेट मतोश्रीचे दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण केल्या. कारण प्रश्न होता मोदींच्या प्रतिष्ठेचा. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकेकाळी राज्यातील प्रत्येक नेत्याची बलस्थानं वापरून शिवसेनेशी विविध पातळीवर वाटाघाटी करणाऱ्या भाजपात सध्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या रोषाला एकट्याला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, सत्तासंघर्ष संवाद बंद झाल्यामुळे चिघळला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांना सांगण्यात आलं आहे की ठरविक लोकच याविषयावर भाष्य करतील. भाजपच्या वतीने केवळ मुख्यमंत्री स्तरावरच चर्चा होईल असं ठरलेलं दिसत आहे. कारण भाजपचे इतर नेते युती होणार, आमची चर्चा सुरु आहे, असं सांगत  आहेत मात्र ती कुठल्या लेव्हलला सुरु आहे या संदर्भात कुठलाही स्पष्टीकरण येत नाही. केंद्रातील नेतेही यामध्ये बोलताना दिसत नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री एकटे पडले असले असे चित्र असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. हा भाजपच्या स्टॅटर्जीचा भाग आहे. यामध्ये कोण प्रथम माघार घेणार किंवा कोण संवादासाठी पुढाकार घेणार हे महत्वाचं आहे, असेही देशपांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News :  SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget