एक्स्प्लोर

मुख्यमंत्री एकटे पडलेत का? शिवसेनेची समजूत काढण्यात यश का येत नाही?

दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी थेट मतोश्रीचे दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण केल्या. कारण प्रश्न होता मोदींच्या प्रतिष्ठेचा. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचं चित्र आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी आहेत. कारण हा संघर्ष सुरू आहे मुख्यमंत्री पदासाठी. निवडणूक निकालापूर्वी आमचं ठरलंय म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता नेमकं काय ठरलं होतं हेच सांगता येत नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अडलेल्या शिवसेनेची समजूत काढण्यात फडणवीस यांना यश येत नसल्याचंच सध्या दिसतंय. याउलट 2014 ला सत्ता स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची टीम खंबीरपणे उभी होती. यामध्ये शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार कायम आघाडीवर असायचे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि वेळप्रसंगी नितीन गडकरी आपले संबंध वापरून मातोश्रीची नाराजी दूर करण्यासाठी पुढे सरसवायचे. मात्र सध्यपरिस्थितीत चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार सोडल्यास यापैकी एकही जण फडणवीस यांच्या टीम मध्ये राहिलेले नाहीत. काहींचा निवडणुकीत पत्ता कट झाला, तर काहींचा पराभव. नितीन गडकरींना तर राज्याच्या राजकारणात काहीच स्थान नसल्याचं सध्या चित्र आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी थेट मतोश्रीचे दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण केल्या. कारण प्रश्न होता मोदींच्या प्रतिष्ठेचा. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकेकाळी राज्यातील प्रत्येक नेत्याची बलस्थानं वापरून शिवसेनेशी विविध पातळीवर वाटाघाटी करणाऱ्या भाजपात सध्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या रोषाला एकट्याला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, सत्तासंघर्ष संवाद बंद झाल्यामुळे चिघळला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांना सांगण्यात आलं आहे की ठरविक लोकच याविषयावर भाष्य करतील. भाजपच्या वतीने केवळ मुख्यमंत्री स्तरावरच चर्चा होईल असं ठरलेलं दिसत आहे. कारण भाजपचे इतर नेते युती होणार, आमची चर्चा सुरु आहे, असं सांगत  आहेत मात्र ती कुठल्या लेव्हलला सुरु आहे या संदर्भात कुठलाही स्पष्टीकरण येत नाही. केंद्रातील नेतेही यामध्ये बोलताना दिसत नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री एकटे पडले असले असे चित्र असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. हा भाजपच्या स्टॅटर्जीचा भाग आहे. यामध्ये कोण प्रथम माघार घेणार किंवा कोण संवादासाठी पुढाकार घेणार हे महत्वाचं आहे, असेही देशपांडे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

व्हिडीओ

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget