एक्स्प्लोर

 Atul Londhe on BJP : महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान? राम कदमांचा आरोप, काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

धुळ्यात सापडलेल्या तलवारींच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेशासित राज्यातून या तलवारी आल्या असल्याचा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.

 Atul Londhe on BJP : धुळ्यामध्ये सापडलेल्या 90 तलवारींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेशासित राज्यातून या तलवारी आल्या असल्याचा आरोप राम कदम यांनी केल आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणाहून या तलवारी धुळ्यामध्ये जात होत्या असे कदम म्हणाले. महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान कोण रचतयं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपावर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

दंगलीचा फायदा नेमका कोणाला होतो? असा उलटा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही तलवारीवर बोलता पण गुजरातमधून आलेल्या ड्रग्जवर का बोलत नाही. भाजपच्या राज्यातून ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर येत आहे, त्यावर काय कारवाई केली ते सांगा? असा सवालही लोंढे यांनी राम कदम यांना केला.

भाजपचे नेते नेहमी दोन समुदायमध्ये भांडण व्हावे अशीच वक्तव्ये करत असल्याचे लोंढे म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी शांत राहिले तर सगळा देश शांत होईल असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या लखनौ विद्याविपाठात 50 विद्यार्थी बॉम्ब बनवताना पकडले गेले.  ते अल्पसंख्याक असते तर बवाल झाला असता, मात्र ती बातमी दाबली गेली. त्याबाबत काय करणार आहेत असा सवालही लोंढे यांनी उपस्थितीत केला. दरम्यान, ज्या तलवारी सापडल्या त्याबाबत राज्य सरकार चौकशी करणार आहे.  गृहमंत्रालय याच्या तळाशी जाणार असल्याचे लोंढे म्हणाले. जे कोणी महाराष्ट्राचे वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यावर कारवाई होईल असेही लोंढे यांनी सांगतिले. दरम्यान, महाराष्ट्रात जे ड्रग्ज येत आहे, त्याच्यावरही बंधन टाकले पाहिजे असे लोंढे म्हणाले. भाजप राज्यातील जनतेला नशेली करण्याचे काम करत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.
 
महाराष्ट्रात काय घडते ते बघा. युपीत काय चालले हे महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे का?  या तलावारी राजस्थानमधूनच का येतात? इकडे तिकडे बोटे का दाखवता, बोटे दाखवू नका जबाबदारी घ्या, असेही राम कदम यावेळी म्हणाले.

प्रकरण काय

धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग करताना एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने एक भरधाव स्कॉर्पिओ कार येत होती. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने गाडी न थांबवता आणखी जोराने पळवली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पाठलाग करुन संबंधित गाडी थांबवून विचारणा केली. यावेळी गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 90 तलवारी आढळून आल्या. सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Rain Girish Mahajan: नाशिकवर ढगफुटीचं संकट ओढावलं, रात्री 11 वाजता गिरीश महाजन थेट मैदानात; रात्रीच्या काळोखात 100 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर; नेमकं काय घडलं?
नाशिकवर ढगफुटीचं संकट ओढावलं, रात्री 11 वाजता गिरीश महाजन थेट मैदानात; रात्रीच्या काळोखात 100 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर; नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Pune Rain news: पुण्यात मुसळधार पाऊस, एका रात्रीत धरणांमध्ये पावणेदोन महिने पुरेल इतका पाणीसाठा, खडकवासला 62 टक्के भरलं
पुण्यात मुसळधार पाऊस, एका रात्रीत धरणांमध्ये पावणेदोन महिने पुरेल इतका पाणीसाठा, खडकवासला 62 टक्के भरलं
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; रायगड, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
Embed widget