एक्स्प्लोर

Aurangabad : औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न पेटला; राजकीय पक्ष आक्रमक, लोकांचाही संयम सुटला

Aurangabad Water Issue Latest Update : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न गंभीर झाला असून, यावरून राजकीय वातावरण सुद्धा पेटताना पाहायला मिळत आहे.

'या' शहरात पाणी प्रश्न पेटला; मनसेकडून अनोखं आंदोलन तर भाजपही उतरणार रस्त्यावर

 

औरंगाबाद: आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर अशी ओळख असलेलं तथा  मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न गंभीर झाला असून, यावरून राजकीय वातावरण सुद्धा पेटताना पाहायला मिळत आहे. मनसेकडून आज ( शनिवारी ) 'पाणी संघर्ष यात्रा' काढण्यात आली आहे. तर 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळत आहे. 

शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून,आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मनसेकडून आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील टीव्ही सेंटर भागातील पवन नगर येथून 'पाणी संघर्ष यात्रा' काढण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकऱ्यांनी घरोघरी जाऊन पाणी समस्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहण्याचे आवाहन केले. तसेच संपूर्ण शहरातून तब्बल 25 हजार पत्र जमा करून मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे.

भाजपही उतरणार रस्त्यावर 

औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पैठण गेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच 1999 पासून तर 2014 पर्यंत जिल्ह्याचे खासदारपद सुद्धा सेनेकडच होते. पण तरीही एवढ्या वर्षात पाणी प्रश्न सुटला नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आयुक्तांवर हल्ला

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रशासना विरोधात मोठा संताप पाहायला मिळतोय. तर पाणी प्रश्नावरून नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक होताना सुद्धा पाहायला मिळत असून, याचा प्रत्यय शुक्रवारी औरंगाबाद महानगरपालिका कार्यालयात पाहायला मिळाला. पाणी प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या काही लोकांनी थेट मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला असून, वेळीच पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही परिस्थिती गंभीर होऊ शकते हे मात्र खरं आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget