एक्स्प्लोर

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लगावला. 

Satej Patil Vs Rajesh Kshirsagar: कोल्हापुरात सुरू असलेल्या 100 कोटी रस्ते प्रकल्पावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काल (14 डिसेंबर) प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. सतेज पाटील यांनी रस्ते प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्यांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी केली. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पाटील यांनी 100 कोटींच्या रस्त्यावरून हल्लाबोल केल्यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला आहे. क्षीरसागर म्हणाले की, सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे. कुठल्याही मंचावर या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयारी असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की आम्ही किती प्रकल्प आणले, तुम्ही किती प्रकल आणले? पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकीच काहीच केलं नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.  

महापालिकेच्या मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी..

दरम्यान, सतेज पाटील विधान परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की, कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली आहे. कामावरून ताशेरे ओढले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता व्यवस्थित नाही. आपण (एकनाथ शिंदे यांना उद्देशून) चांगल्या मनाने निधी मंजूर करून शंभर कोटी दिले यासाठी मी आभार मानतो. मात्र, रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का? याचा विचार करण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले. 100 कोटी दिले असले, तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव खाली असल्याचे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी राजकीय आरोप करत नाही आपल्याला माहित आहे. मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे? पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक टोला लगावला. 

100 कोटी रस्ते प्रकल्पाची दयनीय स्थिती 

दरम्यान, कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवर 100 कोटींमधून कामे सुरु आहेत. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर केलेल्या रस्त्यांवर नव्याने सीलकोट करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते करताना अर्धवट स्थितीत काम केल्याने कामाचा दर्जा राहिलेला नाही. कोणत्याच मार्गावर काम व्यवस्थित झालेलं नाही, अशी स्थिती आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget