एक्स्प्लोर

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लगावला. 

Satej Patil Vs Rajesh Kshirsagar: कोल्हापुरात सुरू असलेल्या 100 कोटी रस्ते प्रकल्पावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काल (14 डिसेंबर) प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. सतेज पाटील यांनी रस्ते प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्यांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी केली. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पाटील यांनी 100 कोटींच्या रस्त्यावरून हल्लाबोल केल्यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला आहे. क्षीरसागर म्हणाले की, सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे. कुठल्याही मंचावर या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयारी असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की आम्ही किती प्रकल्प आणले, तुम्ही किती प्रकल आणले? पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकीच काहीच केलं नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.  

महापालिकेच्या मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी..

दरम्यान, सतेज पाटील विधान परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की, कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली आहे. कामावरून ताशेरे ओढले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता व्यवस्थित नाही. आपण (एकनाथ शिंदे यांना उद्देशून) चांगल्या मनाने निधी मंजूर करून शंभर कोटी दिले यासाठी मी आभार मानतो. मात्र, रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का? याचा विचार करण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले. 100 कोटी दिले असले, तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव खाली असल्याचे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी राजकीय आरोप करत नाही आपल्याला माहित आहे. मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे? पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक टोला लगावला. 

100 कोटी रस्ते प्रकल्पाची दयनीय स्थिती 

दरम्यान, कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवर 100 कोटींमधून कामे सुरु आहेत. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर केलेल्या रस्त्यांवर नव्याने सीलकोट करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते करताना अर्धवट स्थितीत काम केल्याने कामाचा दर्जा राहिलेला नाही. कोणत्याच मार्गावर काम व्यवस्थित झालेलं नाही, अशी स्थिती आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget