एक्स्प्लोर

कामगारांचा देशव्यापी संप; शाळा-कॉलेज सुरु, सार्वजनिक वाहतूक सुरळीत

भारत बंद असला तरी राज्यातील शाळा-महाविद्यालयं सुरु राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली आहे.

मुंबई : देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि देशविरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी हा संप करण्यात येत आहे. या बंदमध्ये देशातील दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसोबतच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा संघटनांनी केला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला भारतीय कामगार संघ या संपात सहभागी होणार नाही.

दरम्यान भारत बंद असला तरी राज्यातील शाळा-महाविद्यालयं सुरु राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली आहे. तसंच बंदला पाठिंबा द्यायचाच असेल तर शिक्षक, प्राध्यापकांनी काळ्या फिती लावाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. यानंतर प्राध्यापक-शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.

काय आहेत मागण्या? बेरोजगारी हटवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत किमान मजुरीचे दर निश्चित करावेत कामगारांनी सामाजिक सुरक्षा मिळावी कामगारांना 21,000 रुपये एवढं किमान मासिक वेतन मिळावं

बँक व्यवहार कोलमडण्याची शक्यता या भारत बंदमध्ये बँक कर्माचारीही सहभागी होणार असल्यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. एटीएममधले पैसे संपेपर्यंतच ही सेवा सुरु राहिल. ज्या बँकेचे कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी होतील त्या ठिकाणी बँकेच्या कामांना विलंब लागू शकतो. तर काही बँका बुधवारी बंद राहू शकतात. बँक बंद असल्याने 8 आणि 9 जानेवारी या दोन दिवसांमध्ये एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. ऑनलाईन सुविधा मात्र सुरळीत चालू असतील.

...तर शिस्तभंगाची कारवाई महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जर का या संपात सहभाग घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. महाराष्ट्र डीजीआयपीआरने याबाबत ट्वीट केलं आहे.

भाजीपाला आवकीवर परिणाम नाही आज अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. आतापर्यंत 550 ते 600 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. दहा वाजेपर्यंत हीच आवक 700 गाड्यांवर जाण्याची शक्यता आहे. या बंद मध्ये माथाडी कामगार संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि एपीएमसी व्यापारी संघटनांचा सहभाग नसल्याने व्यावहार सुरळीत सुरु आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर, सांगली, परराज्यातून गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश इथून भाजीपाला आवक चांगली झाली असल्यामुळे दरही स्थिर राहिले आहेत.

या भारत बंदचा मुंबईच्या जनजीवनावर सध्यातरी कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे, रिक्षा, टॅक्सी व्यवस्थित सुरु आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
Avinash Jadhav : बिनविरोध निवडणूक बाबतची अविनाश जाधव यांची याचिका कोर्टाने फेटाळली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget