एक्स्प्लोर

शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल : संजय राऊत

शिवसेनेवर टीका करताना मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यावर शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

मुंबई : शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिलं. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. एबीपी माझाशी संजय राऊत यांनी एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेसाठी भाजपने 'मिशन मुंबई' सुरु केलं आहे. याबाबत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. याबाबत बुधवारी (18 नोव्हेंबर) भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.

'शुद्ध भगवा कोणाचा हे जनता ठरवेल' याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेणं त्यांच्या पक्षासाठी योग्य आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनता घेईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे.

"मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा घाट सुरु आहे. भाजपची सत्ता आल्यास हे नक्कीच होईल," असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, "गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईतील उद्योजकांना आपल्या राज्यात बोलावतात. याविरोधात भाजपचा एकही नेता बोलत नाही, पण शिवसेनेचे नेते बोलतता."

मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

कंगना रनौत, अर्णब गोस्वामींवर नाव न घेता टीका संजय राऊत यांनी यावेळी नाव न घेता अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वारी यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणाले की, "बीएमसीने ज्या नटीचं कार्यालय तोडलं ती भाजपची कार्यकर्तीच आहे. ती मुंबई पोलिसांना माफिया म्हणते. मुंबईला पाकिस्तान बोलते. मुंबईकर तिच्याविरोधात उसळून उठले, पण तिच्या समर्थनार्थ कोण आले तर ज्यांच्याकडे शुद्ध भगवा आहे ते."

तर अर्णब गोस्वामी यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. "अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अँकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभे आहोत. पण हे लोक त्या अमराठी अँकरच्या पाठिशी उभे राहून रस्त्यावर येत आहेत. हे तुमचं मराठीपण, हा भगवा?" असं संजय राऊत म्हणाले.

भेसळयुक्त भगवा कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांची या भगव्यासंदर्भातील भूमिका अतिशय तीव्र होती. जर भेसळयुक्त भगवा असेल तर मुंबई महापालिकेवर कधीच फडकणार नाही. आज जो भगवा फडकतोय तो कधी उतरलाच नाही. तुम्ही आज भगवा उतरवण्याच्या कामाला लागला आहात, म्हणजेच तुम्हाला एकप्रकारे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन फडणवीसांच्या टीकेवर राऊत काय म्हणाले? कांजूरमार्ग इथल्या मेट्र कारशेडवरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. "इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजूरमार्ग' अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची गोष्ट ही सरकार आल्यावर झालेली नाही. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची ही भूमिका आहे. जंगल वाचवण्यासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका सोडलेली नाही."

'ट्विटरवर श्रद्धेचं मोजमाप करता येत नाही' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी आठवा स्मृतीदिन होता. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ट्वीट करुन त्यांना आदरांजली वाहिली नाही, यावरही फडवणीस यांनी भाष्य केलं होतं. यावर बाळासाहेबांविषयी सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे, असं राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतील पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. देशाच्या जडणघडणीत पंतप्रधान म्हणून नेहरुंची भूमिका महत्त्वाची आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या मनात श्रद्धा आहे, त्या तशाच राहणार. ट्विटरवर श्रद्धेचं मोजमाप करता येत नाही. अलिकडे देशाच्या राजकारणात ट्विटरसेना निर्माण झाली आहे."

'बीएमसीवरील भगव्याला हात लावण्याचीही त्यांच्यात हिंमत नाही' "भाजपचं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना बीएमसीत इंटरेस्ट आहे कारण त्यांना मुंबईत इंटरेस्ट आहे, मुंबईतील उद्योगांमध्ये इंटरेस्ट आहे, आर्थिक उलाढालीत इंटरेस्ट आहे. त्यांना मुंबईला दिल्लीची पायपुसणी करायची आहे आणि आम्ही ते होऊ देत नाही, याचं त्यांना दु:ख आहे. त्यांना मुंबई विकायची आहे, मुंबई घशात घालायची आहे. आमचं म्हणणं आहे की, मुंबई श्रमिकांची आहे, मराठी माणसांची आहे. त्यांना मुंबई ओरबडायची आहे. 100 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरचा भगवा उतरवण्याची सोडा, त्याला हात लावण्याचीही तुमची हिंमत नाही. हात जळून खाक होतील. कारण त्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचं रक्त त्याग आहे," असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Sanjay Raut: रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...
रात्री जयंत पाटील-फडणवीसांची भेट, आता शरद पवारांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकायला पाठिंबा देण्याची चर्चा, संजय राऊत म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष ; दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
Embed widget