एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

आम्ही टीका करणार नाही म्हंटलं होतं पण आता यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2022 ला होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच भाजपने कंबर कसली आहे. यासाठी आज मुंबई भाजप कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला.

राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे. आता औदार्य नाही, प्रत्येक वार्डात, बूथमध्ये नेता नेमणार. प्रत्येक बूथमध्ये राजकीय कार्यकर्ते घडवा. युवा मोर्चाने प्रत्येक बूथमध्ये 50 युवा आणि महिला मोर्चाने 100 घरात महिलांना जोडलं पाहिजे. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली त्याचं पतन निश्चित आहे. जनतेसाठी तो माज तोडावाच लागेल. 2022 साली मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

कोरोना आटोक्यात आलाय म्हणून पाठ थोपटवून घेणाऱ्यांना सवाल आहे की देशात सर्वाधिक केसेस मुंबईत, महाराष्ट्रात का? देशातील 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात का? फक्त मुंबईत 10 हजार मृत्यू हे नेमकं कोणाचं कर्तृत्व आहे? महाराष्ट्रसारखी भीषण अवस्था कुठेच नव्हती. कोरोनाच्या नावाने अनेकांनी आपलं भलं करून घेतलं, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे. आम्ही टीका करणार नाही म्हंटलं होतं पण आता यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

वीज बिलं कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरलं. हे विश्वासघातकी सरकार आहे. केंद्राने आणलेल्या योजनेत चार चांगल्या राज्यातील युटिलिटीमध्ये महाराष्ट्र हे राज्य होते. हे सरकार सावकारांसारखे गरीबांकडून पैशे उकळण्याचे काम करत आहे. गरीब मरत असतांना या सरकारने बदल्यांचा बाजार मांडला, असं फडणवीस यांनी म्हटलं.

टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग

बिहारमध्ये भाजपने विजय मिळवला, कारण तिथला सामान्य माणूस गरीब कल्याण योजनेचा लाभार्थी आहे. आपण बिहार, मणिपूर, उत्तरप्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटकात जिंकलो. उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिणेत आपण जिंकलो कारण लोकांना कर्मयोग आवडतो, बोलघेवडेपणा आवडत नाही. राज्यात सर्व रखडलेले प्रकल्प आपण पूर्णत्वास नेले. पृथ्वीराज चव्हाण नेहमी दिल्लीतून हात हलवत यायचे. ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, मेट्रो, वांद्रे - वर्सोवा सी लिंक, रोरो सर्विस, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प या कामांची मुहूर्तमेढ रोवली. धाराविचा प्रश्न सोडवला, पण यांनी त्याचं रिटेंडरिंग केलं. 800 कोटी रुपये मोजून आपण रेल्वेची जागा विकत घेतली म्हणून धारावी प्रकल्प कोणीच थांबवू शकत नाही. नवी मुंबईचं एअरपोर्टचं 20 वर्षांपासून रखडलेले काम आपण सुरू केले, असा पाढाच फडणवीसांनी वाचला. इच्छा तिथे मार्ग पण आता नवीन वाकप्रचार ऐकला, "टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग"; असा टोलाही फडणवीसांचा ठाकरे सरकारला लगावला.

महाविकास आघाडी सरकार विकासविरोधी सरकार

स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या सत्तेत किती अनधिकृत काम केले? किती नदी नाले बुजवले? मेट्रोच्या कामाला विरोध कोणी केली? 50 हजार कोटींच्या गुंतवणुकीची बुलेट ट्रेनला विरोध करून राज्याचं नुकसान केलं. त्यासाठी लागणारं लोखंड, सिमेंट हे ओल्याच राज्यातून येणार होतं, आंदोलनं केल्याने राज्यात पैसा गुंतवणूक करणार कोण? असे सवाल उपस्थित करत हे विकासविरोधी सरकार आहे. जनतेचा असल्या आंदोलनांना पाठिंबा नाही. त्यांना मेट्रो आणि बुलेट ट्रेन हवीय, असं त्यांनी म्हटलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Lawande: मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन दिलेत, साधी दखलही नाही; कदाचित माझ्या मृत्यूची वाट पहिली जात असेल; शाईफेक प्रकरणावरून विकास लवांडे यांचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांना दोन वेळा निवेदन दिलेत, साधी दखलही नाही; कदाचित माझ्या मृत्यूची वाट पहिली जात असेल; शाईफेक प्रकरणावरून विकास लवांडे यांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates:मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Maharashtra Live News Updates: मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज पाच तासांचा मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 25 मिनिटं उशिरा
Ashok Saraf: 'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
June 2026 Astrology: मे जाता जाता 5 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! पौर्णिमा, शिवयोग-सिद्धयोगचा पॉवरफुल संयोग, मोठ्ठी संधी, जून महिना आरामात... 
मे जाता जाता 5 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! पौर्णिमा, शिवयोग-सिद्धयोगचा पॉवरफुल संयोग, मोठ्ठी संधी, जून महिना आरामात... 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Embed widget