एक्स्प्लोर

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे.

पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल? पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे. पासपोर्टसाठी वेबसाईटवर अकाऊंट बनवल्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन डेटा एन्ट्री ऑनलाईन डेटा अपलोड करुन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना नेट बंद झाल्यास तुम्हाला संपूर्ण फॉर्म पुन्हा भरावा लागेल. ऑफलाईन डेटा एन्ट्री ऑफलाईन ऑर्म भरण्यासाठी वेबसाईटवर वेगळा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय निवडल्यास एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होते. ऑफलाईन डेटा पीडीएफमध्ये भरुन सेव्ह केल्यावर एक्सएमएल फाईल तयार होते, जी अपलोड केल्यावर आपला डेटा वेबसाईटवर अपलोड होतो. व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
सध्याच्या वास्तव्याची कागदपत्रं
1 पाणीपट्टीची पावती
2 फोन बिल
3 वीज बिल
4 इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
5 मतदान ओळखपत्र
6 गॅस कनेक्शन
7 प्रतिष्ठित कंपनीच्या लेटरहेडवरील एम्प्लोयमेंट लेटर
8 पती किंवा पत्नीच्या पासपोर्टची झेरॉक्स (त्यावरील पत्ता एकच असणं आवश्यक)
9 अल्पवयीन मुलांसाठी पालकांच्या पासपोर्टच्या शेवटच्या पानाची झेरॉक्स
10 आधार कार्ड
11 रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट
12 फोटो पासबुक (राष्ट्रीयीकृत बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, आणि प्रादेशिक ग्रामीण बँका)
  व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
वयाची माहिती देणारी कागदपत्रं
1 जन्माचा दाखला
2 शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट
3 एलआयसी बॉण्ड
4 सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस रेकॉर्ड
5 आधार कार्ड
6 मतदान ओळखपत्र
7 पॅन कार्ड
8 ड्रायव्हिंग लायसन्स
9 अनाथ असल्यास अनाथालयाच्या लेटरहेडवर जन्मतारखेचा उल्लेख असलेलं पत्र
  पासपोर्टसाठी दोन प्रकार देण्यात आले आहेत इसीआर आणि नॉन इसीआर म्हणजेच इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड आणि इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड दहावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना इसीआर प्रकारातून अर्ज करावा लागतो तर नॉन इसीआर साठी दहावीनंतरचं बारावी किंवा पदवीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. इसीआर प्रकारातील पासपोर्ट धारकांना परदेशात गेल्यावर इमिग्रेशन चेक करावं लागतं, तर नॉन इसीआर प्रकारातील पासपोर्ट धारकांना इमिग्रेशन चेकची आवश्यकता नसते. फॉर्म भरताना तुमचा कायमचा पत्ता आणि गेल्या वर्षभरापासूनचा पत्ता देणं बंधनकारक आहे. कारण या ठिकाणी पोलीस जाऊन पडताळणी करतात. जर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड आणि पुन्हा पासपोर्टसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज भरताना शक्यतो आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील माहिती भरा. जी पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळली जाते. पासपोर्टसाठी दोन प्रकारे अर्ज दाखल करता येतो. साधारण आणि तात्काळ पासपोर्टसाठीचं शुल्क सामान्य 36 पानी पासपोर्ट 1500 रुपये 60 पानी पासपोर्ट 2000 रुपये तात्काळ 36 पानी पासपोर्ट 3500 रुपये 60 पानी पासपोर्ट 4000 रुपये हे शुल्क ऑनलाईन किंवा स्टेट बँकेच्या चलनाद्वारे भरता येतं. शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या पासपोर्ट केंद्रासाठी तुम्ही अपॉईंटमेंट घेऊ शकता. एकदा शुल्क भरल्यानंतर त्यावर फक्त तीन वेळाच तुम्ही तुमची अपॉईंटमेंट शेड्यूल करु शकता. त्यानंतर पुन्हा शुल्क भरुन नोंदणी करावी लागते. पासपोर्ट सेवा केंद्रात काय केलं जातं? ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अपॉईंटमेंट मिळालेल्या दिवशी ठरलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात दिलेल्या वेळेतच जावं लागतं. आवश्यक कागदपत्र असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्हाला आत सोडलं जातं. आत पुरेशी कागदपत्र असल्याची पडताळणी करुन तुम्हाला टोकन दिलं जातं. हे टोकन तुमची ओळख असतं. कारण त्या केंद्रात टोकनवरुनच तुमचं काम कधी होणार हे कळत असतं आणि तुमची फाईल पुढे सरकत असते. काऊंटर पहिलं या काऊंटरवर तुमची कागदपत्र पाहिली जातात. तुम्ही भरलेल्या अर्जाप्रमाणे सर्व कागदपत्र आहेत का याची पडताळणी या काऊंटरवर होते. इथेच तुमचा फोटो आणि तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. अर्जात नको असलेला मजकूर या ठिकाणी काढला जातो. उदा, पत्त्यातील एखादा मजकूर तुमच्या कागदपत्रांमध्ये नसेल. काऊंटर दुसरं या काऊंटरवर आपल्याला भेटतात ते पासपोर्ट अधिकारी. हे अधिकारी परराष्ट्र खात्याचे कर्मचारी असतात. तुमचा पासपोर्ट रोखण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे आपण जाताना आवश्यक कागदपत्र नेणं गरजेचं आहे. या काऊंटरवर तुमची कागदपत्र बारकाईनं तपासली जातात. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. जसे की पासपोर्ट का हवाय, काय करता, कुठे राहता वगैरे तुम्ही दिलेल्या कागदपत्रांनी पासपोर्ट अधिकाऱ्यांचं समाधान न झाल्यास ते अन्य कागदपत्रांची मागणी करु शकतात. सर्व पडताळणीनंतरच तुमची फाईल पुढच्या काऊंटरकडे सरकवली जाते. काऊंटर तिसरं हे सर्वात महत्त्वाचं काऊंटर आहे. या काऊंटरवर वरिष्ठ अधिकारी असतात. जे तुमच्या अर्जाची पुन्हा छाननी करतात. तुमची कागदपत्र तपासतात. सारं काही सुरळीत पार पडलं तर शेवटी तुम्हाला तुमचा अर्ज अप्रुव्ह झाल्याची पोचपावती याच काऊंटरवर जनरेट केली जाते. जर काही त्रुटी राहिली तर तुम्हाला पुन्हा अपॉईंटमेंट घ्यावी लागते, जी एकदा शुल्क भरल्यावर तीन वेळाच घेता येते. पासपोर्टसाठी कसं होतं पोलीस व्हेरिफिकेशन? पासपोर्टसाठी अर्ज दाखल केल्यानंतर निवडलेल्या पासपोर्ट केंद्रात अपॉईंटमेंट घ्यावी लागते. या केंद्रावर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. तुमच्या कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास त्याची पोच तुम्हाला लगेच मिळते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जातो. एका आठवड्याभरात तुमची माहिती तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पाठवला जातो. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात एक विशेष अधिकारी या सर्व गोष्टींची पडताळणी करतो. ग्रामीण भागात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन आपली कागदपत्र अर्जदाराला घ्यावी लागतात आणि आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी लागतात. शहरी भागात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून ही कागदपत्र तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं जातं. जिथून तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचा अर्ज आणि तुमची माहिती आल्यावर 5 दिवसांमध्ये व्हेरिफिकेशन अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देणं बंधनकारक असतं. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये प्रामुख्याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही ना? तसंच तुम्ही दिलेल्या पत्त्यावर राहता की अन्य कुठे? तुम्हाला तुमच्या गावात लोक ओळखतात का? तुमचं गावातील एकंदर वर्तन या साऱ्या गोष्टींची पडताळणी केली जाते.  हा सर्व रिपोर्ट टाईप करुन त्यावर तुम्हाला ओळखणाऱ्या दोन साक्षीदारांची सही घेतली जाते आणि हा अर्ज अधीक्षक कार्यालयाला पाठवला जातो. जर स्थानिक पोलिसांनी तुमच्या क्लिअर रिपोर्ट दिला तर तुमची माहिती अधीक्षक कार्यालयामार्फत पासपोर्ट कार्यालयाला कळवली जाते. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट जारी केला जातो. मात्र जर स्थानिक पोलिसांनी तुमचा क्लिअर रिपोर्ट दिला नाही, तर तुमचा अर्ज बाद केला जातो. तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर 5000 रुपये दंड आणि पुन्हा पासपोर्ट शुल्क भरावे लागते. तसंच पुन्हा अचूक स्वरुपात अर्ज भरावा लागतो. यावेळी मात्र तुमची कसून तपासणी केली जाते. पाहा व्हिडिओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget