एक्स्प्लोर

देशातले रस्ते मृत्यूचा सापळा, पायी चालणाऱ्या 56 जणांचा दररोज मृत्यू

मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. देशात 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे.

मुंबई : चांगले रस्ते आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा नोंदवलं आहे. हायकोर्टाने विविध खटल्यांवेळी नोंदवलेलं हे मत किती महत्त्वाचं आहे आणि याकडे आपल्या देशात किती दुर्लक्ष होतंय, याचं वास्तव दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे. देशातले रस्ते पायी चालणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. 2017 या वर्षात देशातल्या रस्त्यांवर दररोज 56 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. 2014 मध्ये अशा घटनेत 12 हजार 330 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे. देशातले रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित आहेत. कारण, या रस्त्यांवर बचावात्मक संसाधनांची कमी आहे. या मृत्यूच्या सूचीमध्ये सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही ठेवण्यात आलं आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार देशात गेल्या एका वर्षात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वारांचा रस्त्यावर मृत्यू झाला आहे. कोणत्या राज्यात स्थिती जास्त खराब? रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूची स्थिती सर्वात खराब आहे. गेल्या वर्षात तामिळनाडूमध्ये दररोज 3507 जणांनी आपला जीव गमावलाय. तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, जिथे 1831 जणांनी जीव गमावला. आंध्र प्रदेशमध्ये 1379 जणांचा जीव गेला आहे. दुचाकीस्वारांच्या सर्वाधिक मृत्यूमध्येही तामिळनाडूची परिस्थिती वाईट आहे. तामिळनाडूत 6329, उत्तर प्रदेशात 5699 आणि महाराष्ट्रात 4569 दुचाकीस्वारांचा जीव गेला. विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये पायी चालणाऱ्यांविषयी वाहनचालकांच्या मनात आदर कमी आहे, असं नुकतंच या आकडेवारीवर बोलताना परिवहन विभागाच्या सचिवांनी म्हटलं होतं. देशातील रस्त्यावर गाडी पार्क करणं किंवा छोट्या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्याच्या घटना सर्वसाधारण झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या के. के. कपिला यांच्या मते, रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होण्याचा हा प्रकार दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्येही होतो. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र रस्ते ठेवण्यावर भर देणं गरजेचं असल्याचंही कपिला यांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, वाहनांमधील आधुनिक ब्रेक सिस्टम अँटी ब्रेकिंगच्या माध्यमातूनही अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. अँटी ब्रेकिंगमुळे गाडी जागेवर थांबते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटना टाळली जाऊ शकते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
Embed widget