एक्स्प्लोर

देशातले रस्ते मृत्यूचा सापळा, पायी चालणाऱ्या 56 जणांचा दररोज मृत्यू

मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. देशात 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे.

मुंबई : चांगले रस्ते आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा नोंदवलं आहे. हायकोर्टाने विविध खटल्यांवेळी नोंदवलेलं हे मत किती महत्त्वाचं आहे आणि याकडे आपल्या देशात किती दुर्लक्ष होतंय, याचं वास्तव दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे. देशातले रस्ते पायी चालणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. 2017 या वर्षात देशातल्या रस्त्यांवर दररोज 56 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. 2014 मध्ये अशा घटनेत 12 हजार 330 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे. देशातले रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित आहेत. कारण, या रस्त्यांवर बचावात्मक संसाधनांची कमी आहे. या मृत्यूच्या सूचीमध्ये सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही ठेवण्यात आलं आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार देशात गेल्या एका वर्षात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वारांचा रस्त्यावर मृत्यू झाला आहे. कोणत्या राज्यात स्थिती जास्त खराब? रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूची स्थिती सर्वात खराब आहे. गेल्या वर्षात तामिळनाडूमध्ये दररोज 3507 जणांनी आपला जीव गमावलाय. तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, जिथे 1831 जणांनी जीव गमावला. आंध्र प्रदेशमध्ये 1379 जणांचा जीव गेला आहे. दुचाकीस्वारांच्या सर्वाधिक मृत्यूमध्येही तामिळनाडूची परिस्थिती वाईट आहे. तामिळनाडूत 6329, उत्तर प्रदेशात 5699 आणि महाराष्ट्रात 4569 दुचाकीस्वारांचा जीव गेला. विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये पायी चालणाऱ्यांविषयी वाहनचालकांच्या मनात आदर कमी आहे, असं नुकतंच या आकडेवारीवर बोलताना परिवहन विभागाच्या सचिवांनी म्हटलं होतं. देशातील रस्त्यावर गाडी पार्क करणं किंवा छोट्या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्याच्या घटना सर्वसाधारण झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या के. के. कपिला यांच्या मते, रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होण्याचा हा प्रकार दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्येही होतो. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र रस्ते ठेवण्यावर भर देणं गरजेचं असल्याचंही कपिला यांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, वाहनांमधील आधुनिक ब्रेक सिस्टम अँटी ब्रेकिंगच्या माध्यमातूनही अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. अँटी ब्रेकिंगमुळे गाडी जागेवर थांबते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटना टाळली जाऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाहीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
Atul Kulkarni Poem:
"लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.