एक्स्प्लोर

घडलं बिघडलं | 2018 मधील अपघात-घातपाताच्या घटना

देशभरात 2018 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. अपघात आणि घातपाताच्या अनेक घटनांनी देश हादरला. अशाच 2018 या वर्षात घडलेल्या 10 बातम्यांचा आढावा.

मुंबई : देशभरात 2018 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. अपघात आणि घातपाताच्या अनेक घटनांनी देश हादरला. अशाच 2018 या वर्षात घडलेल्या बातम्यांचा आढावा.

1. आंबेनळी बस दुर्घटना 28 जुलै 2018ला आंबेनळी घाटात खासगी बस तब्बल 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 31 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच अपघातासाठी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आंबेनळीचा हा अपघात ही संशयाच्या भोवऱ्याच सापडला.

2. भय्यू महाराज यांची आत्महत्या इतरांना तणावातून बाहेर काढणारे आध्यत्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडत जून महिन्यात आत्महत्या केली. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोलिसांना सुसाईड नोट ही सापडली. मात्र भय्यू महाराज कोणत्याही प्रकारच्या तणावात नव्हते. त्यांच्या मृत्यूमागे दुसरेच काही कारण असून तपास करण्याची मागणी त्यांच्या मुलीनं केली.आरोपामुळे भय्यूजी महाराजानी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला ही शंका उपस्थित झाली.

3. अमृतसर रेल्वे दुर्घटना 19 ऑक्टोबर अर्थात दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देश हादरला. संध्याकाळी रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असताना अचानक आलेल्या रेल्वेने तब्बल 59 लोकांचा जीव घेतला. शेकडो लोक या दुर्घटनेत जखमी झाले. घटनेला जबाबदार कोण यासाठी चौकशी समितीही नेमण्यात आली. मात्र घटनेनं संपूर्ण देशावर शोककळा पसरली.

4. आश्विनी बिद्रे हत्याप्रकरण

महिला पोलिस अधिकारी आश्विनी बिद्रे यांच्या हत्याप्रकरणाचा अखेर यावर्षी छडा लागला. 2016 साली महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या. तब्बल एक वर्ष शोध घेतल्यानंतरही यश हाती आलं नाही. आश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या आरोपावरुन पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली. तपासात हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.

5. पोलीस अधिकारी हिमांशू रॉय आत्महत्या ज्यांच्या खाक्यानं दहशतवाद्यांचे धाबे दणाणले, त्या हिमांशू रॉय यांनी स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉलवरने स्वत:चं आयुष्य संपंवलं. सुपरकॉप म्हटलं जाणारा एक कणखर अधिकारी आजारपणामुळे मे महिन्यात महाराष्ट्राने गमावला.

6. अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू भारताची पहिली महिला सुपरस्टार समजली जाणाऱ्या श्रीदेवीचाही मृत्यू यावर्षी झाला. दुबईतल्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने सांगण्यात आलं. अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

7. बुराडी आत्महत्या प्रकरण एकाच घरात लटकलेल्या 11 जणांच्या मृतहेदांनी यावर्षी अवघ्या देशाला हादरवून सोडलं. दिल्लीतल्या बुराडीतल्या परिवाराच्या मृत्यू प्रकारणावरही संशय व्यक्त करण्यात आला. मात्र घरात सापडलेल्या एका डायरीमुळे सगळा प्रकार उघडकीस आला. अंधश्रद्धेतून परिवारातील सर्वच लोकांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

8. धुळे हत्याकांड जुलै महिन्यात धुळ्यात एका अफवेनं पाच जणांचा जीव घेतला. लहान मुलांना चोरणारी टोळी समजून धुळ्यातील राईनपाडा गावात पाच जणांना जमावनं ठेचून मारलं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या सर्वांना मारहाण करण्यात आली. या घटनेत 23 जणांना अटकही करण्यात आली.

9. मंगळवेढ्याचं 'सैराट' 4 ऑक्टोबर 2018 रोजी मंगळवेढ्यात सैराटची भीषण पुनरावृत्ती घडली. समाजातील खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रेमविवाह केलेल्या पोटच्या मुलीला आई-वडिलानी संपवलं. अनुराधा बिराजदार ही वैद्यकीय शिक्षण घेत होती. मुलीने शेतातील सालगड्याच्या मुलांसोबत प्रेमविवाह केला. ही बाब तिच्या आई-वडिलांना पटली नाही. अनुराधानं आधी लिहलेल्या एका चिठ्ठीत भीती व्यक्त केली होती. त्यावरुनच त्याच्या आई-वडिलांनी तिला मारल्याचे उघड झाले.

10. गुदद्वारात हवा सोडल्याने मृत्यू यावर्षी झालेल्या एका विचित्र अपघातानं साऱ्याचं लक्ष वेधलं. टाईमपास म्हणून एका कामगाराच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरने हवा सोडल्याने एकाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला. आदित्य जाधव हा एका कंपनीत काम करायचा. नातेवाईंच्या संशयावरुन सीसीटीव्ही तपासण्यात आलं. यामुळे धक्कादायक घटनेचा खुलासा झाला. याप्रकरणी कारखान्यातील सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

11. घाटकोपर विमान दुर्घटना 28 जूनला आकाशातून कोसळलेल्या विमानामुळे मुंबईकरांची पायाखालची जमीन सरकली. घाटकोपरसारख्या अंत्यत वर्दळीच्या भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर चार्टर्ड प्लेन कोसळलं. दुपरची वेळ आणि कामगारांची जेवणाची वेळ यामुळे सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली. मात्र विमानातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला.

12. शिवस्मारक दुर्घटना मुंबईतल्या उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला 24 ऑक्टोबर रोजी गालबोट लागलं. पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बोटीतल्या ताफ्यातील एक बोट खडकावर आदळून बुडाली. बोटीतील 25 पैकी 24 जणांना यातून वाचवण्यात यश आलं. मात्र सिद्धेश पवार या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget