एक्स्प्लोर

खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी काल एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपलं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी तिकीट वाटपाचा निर्णय हा भाजपच्या केंद्रीय कोअर कमिटीचा आहे. त्यात आमचा कोणताही संबंध नाही असे म्हटले आहे.

जळगाव : अनेक व्यासपीठावरुन उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत थेट फडणवीस आणि महाजनांचं नाव घेतलं आहे. या दोन्ही नेत्यांमुळेच आपलं तिकीट कापल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला आहे. त्यामुळं भाजपात पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध खडसे असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप होत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीष महाजन म्हणाले की, नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणे योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन म्हणाले. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.
Eknath Khadse Exclusive | फडणवीस, महाजनांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
कोअर कमिटीच्या वतीने केवळ खडसे यांचेच नव्हे तर अन्य दिग्गज नेत्यांचीही तिकीट कापली गेली आहेत. खडसे यांच्या मुलीला तरी तिकीट देण्यात आले होते. आम्ही तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केले हे आरोप चुकीचं असल्याचं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. काय म्हणाले आहेत खडसे स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथराव खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला होता. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट न दिल्याने आपल्यासह अजून दहा बारा जागांचं देखील पक्षाचं नुकसान एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई झाल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्या आणि जेपी नड्डा यांच्या भेटीत त्यांना सर्व सांगितलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन मला दिलं आहे. त्यांच्या भेटीत माझं पूर्ण समाधान झालं असं नाही. मात्र मी भाजपतच आहे आणि भाजपतच राहणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपचं सरकार महाराष्ट्रात निश्चित आलं असतं. मात्र जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले त्याचा फटका बसला. देवेंद्र फडणवीस एकटे प्रचार करीत फिरले. मात्र राज्यातील नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले नाही. त्यामुळे टीमवर्क उभं राहू शकले नाही त्यामुळे प्रचारावर परिणाम झाला, असेही ते म्हणाले. संबंधित बातम्या एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा  निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना   Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्मयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत  Nagpur | खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण, नागपूरात शरद पवारांची घेतली भेट | ABP  Eknath khadse I एकनाथ खडसेंचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले - फडणवीस I एबीपी माझा  गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस  Eknath Khadase I ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती - एकनाथ खडसे I एबीपी माझा 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 
धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, रेल्वेला मोठा फटका, नंदुरबार मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द 
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, रेल्वेला मोठा फटका, नंदुरबार मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द 

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget