एक्स्प्लोर

Alzheimer's Disease : देशातील 70 वर्षांवरील 10 पैकी एक व्यक्ती अल्झायमरने ग्रस्त, वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य

भारतातील 70 वर्षांवरील  10 पैकी एक व्यक्ती अल्झायमरच्या (Alzheimer's Disease) समस्येने ग्रस्त आहे. अल्झायमरचे वेळीच निदान झाल्यास उपचारास गती मिळते तसेच आजाराचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

मुंबई : जून हा महिना अल्झायमर आणि मेंदू जनजागृती महिना म्हणून जगभर पाळला जातो. अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूचा आजार म्हणून ओळखला जातो. हा वेडेपणाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाच्या अनेक प्रकारांपैकी अल्झायमर हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

कोहिनूर हॉस्पिटलमधील न्यूरो फिजिशियन डॉ. आकाश छेडा म्हणाले की, "नुकतेच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक वयस्क महिला आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह मध्यरात्री  दाखल झाली. तिला तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होता. त्या महिलेने अल्झायमरचे निदान होण्यापूर्वी बऱ्याच डॉक्टरांना भेट दिली होती. तिला पोटात दुखत असल्याने पोटविकार तज्ञांनाही भेट दिली आणि त्यानंतर ओजीडी स्कोपी करण्यात आली. तपासणीअंती ती सामान्य आली. त्या महिलेने सांधेदुखीची तक्रार केली तसेच पाठदुखी  होत असल्याने ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी तिचे मूल्यांकन केले. तिच्या शरीरातील विविध भागांचे एक्स-रे आणि एमआरआय स्कॅन करण्यात आले जे सामान्य दिसून आले. तेव्हा तिचा स्मृतीभ्रंश आणि एकाधिक तक्रारी अस्पष्ट करण्याच्या संबंधाबद्दल नातेवाईकांना समजले. नातेवाईकांना आजाराचे स्वरूप आणि त्यासह असलेल्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांसंबंधी सल्लामसलत करण्यात आले. त्यांची भीती कमी झाली आणि आजार स्वीकार करण्यास ते सक्षम झाले. यासारखे आणखी बरेच रुग्ण आहेत, ज्यांनी कोविड कालावधी तसेच लॉकडाऊनमध्ये उपचारास विलंब केला."

डॉ. आकाश छेडा म्हणाले की, "70 वर्षावरील  10 पैकी एक व्यक्ती अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त असते. लवकर निदान झाल्यास रुग्ण आणि कुटुंबियांना इतर महत्त्वाच्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यास मदत होते. अल्झायमर रोगामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एखादी परिस्थिती किंवा गोष्ट लक्षात ठेवता येत नाही. त्या व्यक्तीने आहार घेतला की नाही हे देखील लक्षात राहत नाही.  अगदी नावे, वैद्यकीय परिस्थिती, संकेतशब्द आणि एखाद्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या घटनांबद्दल विसर पडणे दिसून येते. अल्झायमरमध्ये मेंदूच्या पेशींचे प्रमाण कमी होऊन मेंदू आकुंचन पावतो. गोंधळणे, मनःस्थितीत बदल होणे, अस्वस्थता, गोष्टी समजून न घेणे, शब्दांचा योग्य उच्चार करण्यास असमर्थता आणि दृष्टीदोष अशी या रोगाची काही लक्षणे आहेत."

डॉ. छेडा पुढे म्हणाले, "अल्झायमर रुग्णांसाठी औषधोपचार आणि तसेच थेरपी घेणे उपयुक्त ठरू शकते. डिमेन्शिया गटातील कोणत्याही व्याधींमध्ये मेंदूच्या कार्यात बाधा येते आणि अल्झायमर हा प्रमुख आजार बनून राहतो. एकदा आजार जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि त्यासाठी वेळ न दवडता तात्काळ उपचार घेणे फायद्याचे ठरेल."

वेळीच निदान झाल्यास उपचारास गती मिळते तसेच आजाराचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. जीवनशैलीतील बदल, जसे की रक्तदाब नियंत्रित करणे, धूम्रपान टाळणे, वजन कमी करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, वाचन करणे, पुरेशी झोप येणे, व्यायाम करणे, तणाव कमी करणे आणि मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणे फायदेशीर ठरु शकते. पीडित व्यक्तीपेक्षाही त्याची काळजी घेणाऱ्या आप्तस्वकीयांसाठी ही अवस्था अत्यंत त्रासदायक आणि कसोटीची असते. स्मृतिभ्रंशग्रस्त रुग्णाला आणि त्याच्या परिवाराला सन्मानाची वागणूक देऊन या असाध्य आजाराशी लढण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे असंही डॉ. छेडा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget