एक्स्प्लोर

BLOG : संविधान कोणाची लगाम?

Republic Day 2025: भारतीय जनतेने संविधान स्वसंपरपित करून घेतले असे म्हटले जाते पण सरकारने (सत्तेने) ते कधी स्वसमर्पित करून घेतले का? असा प्रश्न विचारला जात नाही. तो विचारला जाणे देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी जास्त महत्वाचा आहे. 

संविधान कशासाठी असते?

सरकार आणि नागरिक यांच्यातील करार असते संविधान. हा द्विपक्षीय करार आहे. आमच्या देशातील नागरिकांनी हे संविधान स्वसमर्पित केले हे ठीक झाले. पण ते सरकारने स्वसमर्पित केले का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.

संविधानाला सरकारचीच बांधिलकी जास्त महत्वाची का?

सरकारच्या हातात सैन्य आहे, आधुनिक शस्त्रे वापरण्याची शक्ती आहे. सरकारकडे पोलीस आहे. कोणाही नागरिकाला डांबून ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे. सत्तेकडे संपत्तीचा धबधबा असतो. जीएसटीने तर कहर केला आहे. सत्तेला कायदे बनवण्याचा अधिकार असतो. म्हणून सत्तेला संविधानाची लगाम घालण्याची गरज असते. नागरिकांकडे काय असते? ना शस्त्र, ना संपत्ती, ना कायदे करण्याचा अधिकार! सत्ता माजू शकते, भरकटू शकते, क्रूर बनू शकते. तसे होऊ नये म्हणून संविधानाच्या रूपाने सत्तेने जनतेला वचन द्यायचे असते. संविधान लोकांसाठी नसते, तर ते सरकारने पाळायची पघ्ये विषद करण्यासाठी असते. हे लक्षात घेतले तर आपल्या देशात काय झाले ते कळू शकते. अनेक जाणकार मानतात की, संविधान म्हणजे नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी सत्तेने दिलेले वचन आहे.

आमच्या देशात सरकारने वचन पाळले का?

पहिल्याच घटना दुरुस्तीने, पहिल्या दीडच वर्षात वचनभंग केला. पहिल्या घटना दुरुस्तीने (अनुच्छेद 31-ए व बी) एक नवे परिशिष्ट (अनुसूची) जोडण्यात आले व त्या परिशिष्टात सरकार द्वारा दाखल करण्यात आलेले कायदे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर राहतील, अशी तजवीज केली. कमाल शेतजमीन धारणा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे कायदे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारे आहेत, ते परिशिष्ट 9 मध्ये टाकल्याने कायम राहिले. शेवटी लाखो शेतकऱ्यांना मरण कवटाळणे भाग पडले. भारतातील सत्तेने (भारतात संविधान असूनही)शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.

घटना दुरुस्त्या आणि संविधानाचे बेगडी रक्षक

संविधानाचे तथाकथित रक्षक घटना दुरुस्त्या बद्दल ब्र काढत नाहीत. का? ज्या घटनांदुरुस्त्यांनी शेतकऱयांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले ते त्यांना मान्य आहे का? अनुच्छेद 13 मधील इंदिरा गांधींच्या काळात झालेली भयंकर घटना दुरुस्ती जनता पक्षाच्या राजवटीत का रद्द केली गेली नाही, त्या जनता पक्षात आजचे भाजप होते, तसेच डावे कम्युनिस्टही होते. नागरिकांच्या मूलभूत हक्काची यांना तमा नाही. विशेषतः शेतकरी मेला तरी त्यांना फिकीर नाही. तथाकथित संविधान रक्षक जर घटना दुरुस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतील तर त्यांना बेगडीच म्हणावे लागेल.

आता तरी सत्तेने संविधान स्वीकारावे

26 जानेवारी 1950 ला भारतीय जनतेने संविधान स्वीकारले होते, आता 75 वर्षा नंतर का होईना सरकारने मूळ संविधान स्वीकारावे व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा (स्वातंत्र्याचा) जेथे जेथे संकोच करण्यात आला त्या सर्व घटना दुरुस्त्या रद्द कराव्यात. आहे का हिम्मत या मोदी-शहा सरकारची?  हिम्मतपेक्षाही नियत आहे का? मोदी-शहा असो की बेगडी घटना रक्षक हे चट्टे बट्टे आहेत. 1950 ला स्वीकारलेली भारतीय राज्य घटना या देशातील सत्तेला पुकारत आहे की, सत्ताधाऱ्यांनो एकदा आमची मूळ घटना स्वीकारा व नागरिकांना दिलेले वाचन पाळा! 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
Embed widget