एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis: भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या कसा महत्त्वाचा? भारतानं त्याला कसा प्रतिसाद दिला?

Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे.

Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या या कठिण काळात भारत संकटमोचन म्हणून धावला आहे. भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात आहे. श्रीलंकेला मदत करून भारतानं सार्क (नेपाळ, मालदीप बांग्लादेश) देशांना महत्वाचा संदेश दिलाय. 

सार्क देशांमध्ये चीनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. तामिळनाडूमध्ये श्रीलंकेतील आश्रयवादी लोकांची संख्या वाढू लागलीय. भारत अनेकदा श्रीलंकेच्या मदतीसाठी धावून गेलाय. मात्र, यावेळी श्रीलंकेवर आलेलं आर्थिक संकट याआधीच्या तुलनेत खूप मोठं आहे. परंतु, भारतानं पाऊल मागं न घेता श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी सक्रीय मदत केलीय

चीनमुळं श्रीलंकेवर कर्जाचा डोंगर
श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमागे चीनच्या कर्जाचा सापळा हे एक महत्त्वाचे कारण मानलं जातंय. चुकलेली शेतीची धोरणे, कोरोनाचा प्रादुर्भाव व पर्यटनाला बसलेला फटक्यापासून हंबनटोटासारख्या फसलेल्या प्रकल्पांपर्यंत सर्वांचं विश्लेषण होत आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणि राजकीय आघाड्यांवर उलथापालथ होण्याला चीनच्या कर्जाच्या डोंगराचं मुख्य कारण असल्याचंही दिसून आलं आहे. 

भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या किती महत्वाचा?
चीन आणि श्रीलंकेचे आर्थिक संबंध आहेत. तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातही चांगले संबंध आहेत. श्रीलंकेसोबतचे भारताचे सांस्कृतिक आणि समाजिक संबंध फार जुने आहेत. परंतु, मागील दोन दशकांपासून चीनचा श्रीलंकेमधील प्रभाव झपाट्यानं आणि मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. ज्यामुळं भारताला भविष्यात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

कर्जाच्या दबावाखाली भारत शेजारील देशांवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न
महिंद्रा राजपक्षे कुटुंब श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर सत्ता स्थापन केली. याचदरम्यान, चीननं भारताला घेरण्यासाठी भारताशेजारील देशानं जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. चीननं भारताजवळील देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 

सिंहला भाषेला राष्ट्रीय भाषा घोषित
श्रीलंकेत सिंहला आणि तामिळ अशा दोन भाषा बोलणारे लोक राहतात. तामिळच्या तुलनेत सिंहलाची लोकसंख्या अधिक आहे. महिंदा राजपक्षे यांनी सिंहलाला राष्ट्रीयत्व दिलं. दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी एलटीटीईच्या विरोधात लढा पुकारला. त्यावेळी चीननं महिंदा राजपक्षे यांना खूप मदत केली. त्यानंतर श्रीलंका आणि चीनचं संबंध वाढले. त्यानंतर चीननं विमानतळ आणि बंदरात गुंतवणूक वाढवली. एकप्रकारे चीननं श्रीलंकेला कर्जात अडकवलं. 

श्रीलंकेला आर्थिक संकटातून काढण्यासाठी भारताची धाव
चीनच्या कर्जामुळं अडकलेल्या श्रीलंकेची जी अवस्था झाली, तिच अवस्था भारताजवळील इतर देशांची होऊ नये म्हणून भारतानं श्रीलंकेला मदतीचा हात दिला. तसेच कठीण काळात आपल्या मित्र देशांच्या मदतीला धावून भारतानं जगासमोर आदर्श ठेवलाय.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget