एक्स्प्लोर

केदारनाथ.. न झालेला अभिषेक!

आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंड्स्ट्रीत येणं आश्वासक आहे. एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.

खरंतर अभिषेक कपूर हा संवेदनशील दिग्दर्शक आहे. आपल्याला काय मांडायचं आहे याची त्याला पुरेपूर कल्पना असते. म्हणूनच त्याच्या केदारनाथबद्दल उत्सुकता होती. सिनेमाचा ट्रेलर आला आणि ती उत्सुकता आणखी वाढली. कारण या ट्रेलरमध्ये एक प्रेमकहाणी दिसत होती. शिवाय, त्यात केदारनाथला आलेला प्रलयही दिसत होता. काहीतरी चकित करणारं आपण पाहणार आहोत, असं वाटत होतं. पण यावेळी थोडा घोळ झालाय. त्या घोळाबद्दल सविस्तर सांगेन, पण सगळ्यांना उत्सुकता होती ती सारा अली खानची. श्रीदेवीच्या मुलीनंतर सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती सैफ आणि अमृताच्या मुलीची. तर आवर्जून सांगण्यासारखी बाब अशी, की साराचं यातलं काम खूपच आश्वासक झालं आहे. शिवाय बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेले नितीश भारद्वाजही तितकेच मनात ठसतात.
कलाकारांच्या कामाची दखल आपण घेऊया. सुशांतसिंगनेही मन्सूर रंगवताना भक्तांना पाठीवरून शिखरावर नेणाऱ्याची भूमिका चोख केली आहे. त्यासाठी त्याने भरपूर मेहनतही घेतली आहे. कारण, तो सगळा व्यवहार करताना कुठेही नवखेपणा आलेला दिसत नाही. हा सगळा भाग एकिकडे. पण यावेळी मात्र  पटकथा मांडताना आपल्याला नेमकं काय मांडायचंय यात त्याचा उडालेला गोंधळ सिनेमा पाहताना जाणवतो.
ही गोष्ट मन्सूर आणि मंदाकिनीची आहे. मंदाकिनी हिंदू पंडिताची मुलगी तर मन्सूर हा वाटाड्या. मंदाकिनी मनमौजी आहे. तिचं लग्न तिच्या मनाविरूद्ध केदारनाथच्याच एका उच्चवर्णीय हिंदू मुलाशी ठरलेलं आहे. पण मंदाकिनीला तो मान्य नाही. याचवेळी तिची आणि मन्सूरची भेट होते. त्यानंतर दोघेही प्रेमात पडतात. मग हिंदू विरूद्ध मुस्लीम असा संघर्ष गावात पेटू लागतो. पुढे त्यांच्या प्रेमाचं काय होतं.. ही कथा कोणत्या वळणावर असताना पुराचा प्रलय येतो अशा सगळ्या गोष्टी या सिनेमात मांडण्यात आल्या आहेत.
जर या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रीत केलं, तर हिंदू मुस्लीम प्रेमकहाण्या आपण यापुर्वीही पाहिल्या आहेत. केदारनाथाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते त्यामुळे व्हिज्युअली ट्रीट मिळते. पण कथा म्हणून या प्रेमकहाणीत फार चढउतार नाहीत. मनाला भावतील असे संवाद नाहीत. सिनेमाच्या शेवटी प्रलय येतो. तो येऊन गेल्यावर मध्येच केदारनाथ इथे आलेल्या पुराचे खरी फुटेजं वापरण्यात आली आहेत. त्यात किती लोक मृत्युमुखी पडले, किती लोक हरवले, सैन्याने किती लोकांना वाचवलं ही सगळी माहिती अचानक समोर येते आणि पुन्हा मूळ सिनेमा सुरू होतो. तीन वर्षांनंतर... असं सांगत एक सीन होतो आणि सिनेमा संपतो.
या सगळ्या प्रकारामुळे हा सिनेमा नेमका प्रेमकथेवर आहे की प्रलयावर ते कळत नाही. शिवाय त्यात सत्यघटनेची आकडेवारी आल्यामुळे हा सिनेमा डाॅक्युड्रामा होऊ लागतो. दिग्दर्शक म्हणून हा महापूर दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला होऊच शकतो. पण त्यासाठी त्याची प्रेमकथा अधिक चित्तवेधक आणि उत्कट असायला हवी होती असं वाटून जातं.
कलाकारांचा अभिनय, छायांकन, व्हीएफएक्स, संगीत या सगळ्या पातळ्यांवर चित्रपट नेटका असल्यामुळे तो खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो खरा. पण आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं, असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंडस्ट्रीत येणं आश्वासक आहे.
एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.
केदारनाथ.. न झालेला अभिषेक!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
Raja Shivaji: मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?
मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?
Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, किती कोटींची भर?
'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना; दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, किती कोटींची भर?
Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
Embed widget