एक्स्प्लोर

केदारनाथ.. न झालेला अभिषेक!

आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंड्स्ट्रीत येणं आश्वासक आहे. एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.

खरंतर अभिषेक कपूर हा संवेदनशील दिग्दर्शक आहे. आपल्याला काय मांडायचं आहे याची त्याला पुरेपूर कल्पना असते. म्हणूनच त्याच्या केदारनाथबद्दल उत्सुकता होती. सिनेमाचा ट्रेलर आला आणि ती उत्सुकता आणखी वाढली. कारण या ट्रेलरमध्ये एक प्रेमकहाणी दिसत होती. शिवाय, त्यात केदारनाथला आलेला प्रलयही दिसत होता. काहीतरी चकित करणारं आपण पाहणार आहोत, असं वाटत होतं. पण यावेळी थोडा घोळ झालाय. त्या घोळाबद्दल सविस्तर सांगेन, पण सगळ्यांना उत्सुकता होती ती सारा अली खानची. श्रीदेवीच्या मुलीनंतर सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती सैफ आणि अमृताच्या मुलीची. तर आवर्जून सांगण्यासारखी बाब अशी, की साराचं यातलं काम खूपच आश्वासक झालं आहे. शिवाय बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेले नितीश भारद्वाजही तितकेच मनात ठसतात.
कलाकारांच्या कामाची दखल आपण घेऊया. सुशांतसिंगनेही मन्सूर रंगवताना भक्तांना पाठीवरून शिखरावर नेणाऱ्याची भूमिका चोख केली आहे. त्यासाठी त्याने भरपूर मेहनतही घेतली आहे. कारण, तो सगळा व्यवहार करताना कुठेही नवखेपणा आलेला दिसत नाही. हा सगळा भाग एकिकडे. पण यावेळी मात्र  पटकथा मांडताना आपल्याला नेमकं काय मांडायचंय यात त्याचा उडालेला गोंधळ सिनेमा पाहताना जाणवतो.
ही गोष्ट मन्सूर आणि मंदाकिनीची आहे. मंदाकिनी हिंदू पंडिताची मुलगी तर मन्सूर हा वाटाड्या. मंदाकिनी मनमौजी आहे. तिचं लग्न तिच्या मनाविरूद्ध केदारनाथच्याच एका उच्चवर्णीय हिंदू मुलाशी ठरलेलं आहे. पण मंदाकिनीला तो मान्य नाही. याचवेळी तिची आणि मन्सूरची भेट होते. त्यानंतर दोघेही प्रेमात पडतात. मग हिंदू विरूद्ध मुस्लीम असा संघर्ष गावात पेटू लागतो. पुढे त्यांच्या प्रेमाचं काय होतं.. ही कथा कोणत्या वळणावर असताना पुराचा प्रलय येतो अशा सगळ्या गोष्टी या सिनेमात मांडण्यात आल्या आहेत.
जर या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रीत केलं, तर हिंदू मुस्लीम प्रेमकहाण्या आपण यापुर्वीही पाहिल्या आहेत. केदारनाथाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते त्यामुळे व्हिज्युअली ट्रीट मिळते. पण कथा म्हणून या प्रेमकहाणीत फार चढउतार नाहीत. मनाला भावतील असे संवाद नाहीत. सिनेमाच्या शेवटी प्रलय येतो. तो येऊन गेल्यावर मध्येच केदारनाथ इथे आलेल्या पुराचे खरी फुटेजं वापरण्यात आली आहेत. त्यात किती लोक मृत्युमुखी पडले, किती लोक हरवले, सैन्याने किती लोकांना वाचवलं ही सगळी माहिती अचानक समोर येते आणि पुन्हा मूळ सिनेमा सुरू होतो. तीन वर्षांनंतर... असं सांगत एक सीन होतो आणि सिनेमा संपतो.
या सगळ्या प्रकारामुळे हा सिनेमा नेमका प्रेमकथेवर आहे की प्रलयावर ते कळत नाही. शिवाय त्यात सत्यघटनेची आकडेवारी आल्यामुळे हा सिनेमा डाॅक्युड्रामा होऊ लागतो. दिग्दर्शक म्हणून हा महापूर दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला होऊच शकतो. पण त्यासाठी त्याची प्रेमकथा अधिक चित्तवेधक आणि उत्कट असायला हवी होती असं वाटून जातं.
कलाकारांचा अभिनय, छायांकन, व्हीएफएक्स, संगीत या सगळ्या पातळ्यांवर चित्रपट नेटका असल्यामुळे तो खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो खरा. पण आणखी काहीतरी सिनेमात असायला हवं होतं, असं वाटत राहतंं. या सगळ्यात भाव खाऊन जाते ती सारा. तिचं इंडस्ट्रीत येणं आश्वासक आहे.
एकूणात, या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.
केदारनाथ.. न झालेला अभिषेक!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; रितेश देशमुखचं 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण
'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर रितेश देशमुखचं स्पष्टीकरण
Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
Model Divyanshu Joshi Died: 20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत
20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
PhysicsWallah : फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Embed widget