एक्स्प्लोर

Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: सिनेमातील रोलच्या बदल्यात 'हमबिस्तर' होणं सामान्य, बॉलिवूडमधील काळं सत्य अभिषेक बॅनर्जींनी रोखठोक मांडलं

Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: बॉलिवूडमध्ये पूर्वी शारीरिक संबंधांची मागणी करणं ही एक सामान्य गोष्ट होती, जी मीटू चळवळीनंतर बदलली, असं खळबळजनक वक्तव्य अभिषेक बॅनर्जीनं केलं आहे.

Abhishek Banerjees Statement On Bollywood Casting Couch: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) आणि तिची काळी बाजू आपल्या सर्वांनाच परिचयाची झालीय. आजवर अनेक स्टार्सनी (Bollywood Celebrity) याबाबत उघडपणे सांगितलं आहे. अशातच आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बॅनर्जीनं (Abhishek Banerjee) आपलं मन मोकळं केलं आहे. अभिनेत्यानं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव उघडपणे सांगितलं आहे. 

बॉलिवूडमध्ये पूर्वी शारीरिक संबंधांची मागणी करणं ही एक सामान्य गोष्ट होती, जी मीटू चळवळीनंतर बदलली, असं खळबळजनक वक्तव्य अभिषेक बॅनर्जीनं केलं आहे. 'स्त्री' फेम अभिनेत्याची एक कास्टिंग कंपनी आहे. त्याबाबत बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, त्याची कंपनी नेहमीच प्रतिभेला प्राधान्य देते आणि कोणताही कर्मचारी या चुकीच्या ट्रेंडचा भाग बनू नये, याची खात्री करते, तसेच काळजीसुद्धा घेते.

अभिषेक बॅनर्जीनं मिड-डेशी बोलताना सांगितलं की, मीटू चळवळीनंतर कॉफी शॉप मीटिंग्ज आणि डिनर मीटिंग्जमध्ये घट झाली आहे. तो म्हणाला की, हा एक मोठा बदल आहे. अभिनेत्यानं सांगितलं की, जेव्हा तो त्याच्या महिला सहकाऱ्यांशी बोलतो, तेव्हा त्याला जाणवतं की, आता त्या अधिक समजूतदार झाल्या आहेत आणि आता मुलं भोळी राहिलेली नाहीत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhishek Banerjee (@nowitsabhi)

अभिनेत्यानं स्वतःच्या कास्टिंग कंपनीसाठी बनवले कठोर नियम

कास्टिंगच्या बहाण्यानं कॉफी शॉप आणि डिनर मीटिंग्ज आयोजित केल्या जात होत्या, जे का केलं जायचं, हे अजुनही अभिषेक बॅनर्जी कधीच समजू शकलेला नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कास्टिंग कंपनीमध्ये एक अतिशय कडक नियम होता की, कोणीही ऑफिसबाहेर अभिनेत्याला भेटू शकत नाही. जर कोणी ऑफिसबाहेर भेटत असेल तर तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्या व्यक्तीला भेटणार नाही. जर अभिनेत्याला याबाबत कळलं की, कोणीतरी कॉफी शॉपमध्ये कास्टिंगसाठी एखाद्या अभिनेत्याला भेटलंय, तर त्यांना थेट कामावरून काढून टाकलं जाईल, असे सक्त नियम अभिनेत्यानं बनवले आहेत. 

अभिषेक बॅनर्जीनं बोलताना सांगितलं की, "शारीरिक संबंधांची मागणी इतकी सामान्य होती की, जेव्हा लोकांना त्याच्या कंपनीच्या कठोर नियमांबद्दल आणि कामाच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीबद्दल कळलं, तेव्हा अनेकांना धक्का बसला." अभिनेत्यानं पुढे बोलताना सांगितलं की, इतर कास्टिंग ऑफिसमध्ये 'फ्लर्टिंग' सामान्य असलं तरी, त्यानं खात्री केली की, त्याची कंपनी अशा कामांमध्ये सहभागी होणार नाही. जेव्हा अभिषेक कास्टिंग करायचा, तेव्हा लोकांना विश्वास ठेवणं खूप कठीण झालेलं की, तो कोणत्याही शारीरिक मागणीशिवाय कास्टिंग करतोय. तो म्हणाला की, काम करताना तो फक्त कामच करत होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nana Patekar On Retirement From Film Industry: 'नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं, असं वाटतंय...'; नानां पाटकेरांकडून निवृत्ती जाहीर; 'नाम फाउंडेशन'बाबतही केलं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget