एक्स्प्लोर

पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य

Prakash Ambedkar on Sharad Pawar: शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट कृती करतात हे त्यांच्याबद्दल माझं मापदंड अगदी तंतोतंत खरं ठरल्याचा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला.

Prakash Ambedkar on Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुकींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र करण्याची किमया केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलीन करून सत्तेत सामील होण्याची चर्चा आणखी रंगली आहे. इतकेच नव्हे तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री होतील आणि राज्यांमध्ये अजित पवार यांना एकाधिकार दिले जातील आणि शरद पवार खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सक्रीय राजकारणापासून दूर होतील अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रंगली आहे. 

दरम्यान, काल झालेल्या बारामतीच्या कार्यक्रमामध्ये काका पुतण्या आणि सुप्रिया सुळे यांची जवळीक नव्याने दिसून आली. या सर्व पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा खोचक टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काका आणि पुतण्या एक आले म्हणजे त्यांचं विलीनीकरण झालं आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकलं असल्याचं भाकित वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी  वर्तवलं आहे. 

तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये

शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट कृती करतात हे त्यांच्याबद्दल माझं मापदंड अगदी तंतोतंत खरं ठरल्याचा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असे म्हणत असा खोचक टोलाही आंबेडकर यांनी लगावला. ते म्हणाले की काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोटामध्ये राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या ज्या पक्षांसोबत युती करणार असतील त्यांच्यासोबत काँग्रेसने जाऊ नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हे काँग्रेसने पाळलं नाही, तर महाराष्ट्राप्रमाणे देशभरात त्यांचं अस्तित्व कमी होईल, असा इशारा आंबेडकरांनी काँग्रेसला दिला मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. इतर महापालिकांमध्ये भाजप वगळून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे सुरू असल्याचे ते म्हणाले. ज्या ठिकाणी बोलणी फिस्कटतील त्याठिकाणी आम्ही स्वबळावर लढू, असं आंबेडकरांनी जाहीर केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BMC Election 2026: राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget