SSC Results 2020 | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणतात, 'नापासांनो खचू नका, जिद्दीने यश खेचून आणा'
Maharashtra SSC Results 2020 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्य़ांचं राज्यातील नेत्यांनी अभिनंदन केलं आहे तसंच त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
यशाचे अनेक टप्पे तुम्ही पार करा- शरद पवार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणतात की, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीची दिशा ठरवणारा दहावी परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या सर्वांची शैक्षणिक कारकीर्द अशीच बहरत राहो, आयुष्यात यशाचे अनेक टप्पे तुम्ही पार करत राहो या शुभेच्छा.दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे, दहावीच्या परीक्षेत आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करता. अशा यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 29, 2020
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी. पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा ! शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा ! सर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पूढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीची दिशा ठरवणारा दहावी परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या सर्वांची शैक्षणिक कारकीर्द अशीच बहरत राहो, आयुष्यात यशाचे अनेक टप्पे तुम्ही पार करत राहो या शुभेच्छा.#SSCresults2020 #SSC pic.twitter.com/3k2wQ8g8Ez
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 29, 2020
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणारी 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन! उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा ! सर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पूढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक @INCMaharashtra @INCMumbai @CMOMaharashtra pic.twitter.com/bwHoBPGuWq
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 29, 2020
शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणारी 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन! उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!#sscresult2020 pic.twitter.com/Zrwebhji7I
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 29, 2020
पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI