एक्स्प्लोर

Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाला झळाळी, किंमतीत तीन टक्क्यांची वाढ

गव्हाच्या किंमतीत 1.5 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळं गहू उत्पादकांना फायदा होणार आहे.

Wheat Prices : सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या किंमतीत 1.5 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळं गहू उत्पादकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (PMGKY) विस्तारामुळं आता बाजारात गव्हाची एकूण उपलब्धता देखील वाढणार आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  मात्र, सध्या तरी गव्हाच्या किंमतीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

क्विंंटलमागे गव्हाच्या किंमतीत देशभरात 70 ते 80 रुपयांची वाढ 

गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर गेल्या पंधरवड्यात क्विंटलमागे गव्हाच्या किंमतीत देशभरात 70 ते 80 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या किंमती या 2 हजार 430 ते 2 हजार 450 क्विंटलपर्यंत पोहोचल्या आहेत. याबाबतची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. केंद्र सरकारने  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार केला नाही तर गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या अंतर्गत धान्य वितरणामुळं गव्हाचा एकूण पुरवठा वाढणार आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीतवाढ होण्याचा वेग कमी होईल अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

 भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश

दरम्यान, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. हरितक्रांती 1960 मध्ये सुरु झाली. तेव्हापासून देशातील गव्हाच्या उत्पादनात सुमारे 1,000 टक्के वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला देशाचे एकूण गव्हाचे उत्पादन 98.5 लाख टन होते. जे 2021-22 मध्ये वाढून 1,068.4 लाख टन झाले. गेल्या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी 70 लाख टन अन्नधान्याची निर्यात केली आहे.

गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, हरित क्रांतीने कृषी उत्पादकता वाढवण्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज धान्याचे एकूण उत्पादन हेक्टरी 3 पटीने वाढले आहे. 1960 च्या मध्यात प्रति हेक्टर धान्य उत्पादन 757 किलो होते. जे 2021 मध्ये वाढून 2.39 टन झाले आहे. देशात 2021-22 या वर्षात 10.68 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 10.38 कोटी टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 29.6 लाख टन अधिक आहे. या कालावधीत प्रमुख खरीप पीक भात लागवडीखालील क्षेत्र मागील हंगामातील 343.7 लाख हेक्टरवरून 8 टक्क्यांनी घटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे

व्हिडीओ

Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Embed widget