एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा समारोप टेंभुर्णीत पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis on State Govt : या सरकारमध्ये कोणीतरी शेतकर्‍यांबद्दल बोलताना तुम्ही पाहिले आहे का? 'पिकेल ते विकेल' अशी घोषणा करायची आणि प्रत्यक्षात 'पिकेल ते जळेल' असे धोरण राबवले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीसमोर जे प्रश्न आहेत, ते बारमालकांचे, विदेशी दारुचे दर कमी करण्याचे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी त्यांना काही लेनदेन नाही. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या समारोप टेंभुर्णीत पार पडला. या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या मेळाव्याला फढणवीसांनी संबोधित केलं. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख उपस्थित होते. 


Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

आपत्तीत सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही

10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतात आणि 3000 कोटी पण देत नाहीत. निर्णयानंतर वर्षभर यांचे जीआर निघत नाहीत. जीआर असे काढतात की शेतकर्‍यांसाठी अडथळ्यांची शर्यत तयार होते. वादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा कितीतरी आपत्ती येऊन गेल्या. पण, कवडीची मदत या सरकारने केली नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला आणि शेतकर्‍यांना वाढीव हमीभाव दिला. 10 वर्ष काँग्रेसने हा अहवाल थंडबस्त्यात ठेवला. आज शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. 1.75 लाख कोटी रुपये सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले. 

महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या

आमच्या सरकारने शेततळ्यांची योजना राबवली. गटशेतीची योजना तयार केली. यांत्रिकीकरणासाठी मदत दिली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या आहेत. हे सरकार जुन्या काळातील टेलिफोनसारखे आहे. 1 रुपया टाकला, तरच हॅलो ऐकू येते, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी', तेव्हापासून सर्वच मंत्र्यांचा एकच कार्यक्रम सुरू आहे, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी'! या सरकारने शेतकर्‍यांची दैना केल्याचे फडणवीस म्हणाले.

उजनीचे पाणी वळवण्याचं कारस्थान

आता उजनीचे पाणी वळवण्याचे कारस्थान रचले जात आहे. कितीही पोटात गेले तरी काही लोकांची तहानच भागत नाही. सामंतशाही आणण्याचे काम काही नेते करत असल्याचे ते म्हणाले. हा फक्त यात्रेचा समारोप आहे. आंदोलनाचा समारोप नाही. तर शेतकर्‍यांना जोवर न्याय मिळत नाही, तोवर आपला लढा, संघर्ष असाच सुरु राहील असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget