एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा समारोप टेंभुर्णीत पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis on State Govt : या सरकारमध्ये कोणीतरी शेतकर्‍यांबद्दल बोलताना तुम्ही पाहिले आहे का? 'पिकेल ते विकेल' अशी घोषणा करायची आणि प्रत्यक्षात 'पिकेल ते जळेल' असे धोरण राबवले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीसमोर जे प्रश्न आहेत, ते बारमालकांचे, विदेशी दारुचे दर कमी करण्याचे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी त्यांना काही लेनदेन नाही. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या समारोप टेंभुर्णीत पार पडला. या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या मेळाव्याला फढणवीसांनी संबोधित केलं. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख उपस्थित होते. 


Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

आपत्तीत सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही

10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतात आणि 3000 कोटी पण देत नाहीत. निर्णयानंतर वर्षभर यांचे जीआर निघत नाहीत. जीआर असे काढतात की शेतकर्‍यांसाठी अडथळ्यांची शर्यत तयार होते. वादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा कितीतरी आपत्ती येऊन गेल्या. पण, कवडीची मदत या सरकारने केली नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला आणि शेतकर्‍यांना वाढीव हमीभाव दिला. 10 वर्ष काँग्रेसने हा अहवाल थंडबस्त्यात ठेवला. आज शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. 1.75 लाख कोटी रुपये सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले. 

महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या

आमच्या सरकारने शेततळ्यांची योजना राबवली. गटशेतीची योजना तयार केली. यांत्रिकीकरणासाठी मदत दिली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या आहेत. हे सरकार जुन्या काळातील टेलिफोनसारखे आहे. 1 रुपया टाकला, तरच हॅलो ऐकू येते, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी', तेव्हापासून सर्वच मंत्र्यांचा एकच कार्यक्रम सुरू आहे, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी'! या सरकारने शेतकर्‍यांची दैना केल्याचे फडणवीस म्हणाले.

उजनीचे पाणी वळवण्याचं कारस्थान

आता उजनीचे पाणी वळवण्याचे कारस्थान रचले जात आहे. कितीही पोटात गेले तरी काही लोकांची तहानच भागत नाही. सामंतशाही आणण्याचे काम काही नेते करत असल्याचे ते म्हणाले. हा फक्त यात्रेचा समारोप आहे. आंदोलनाचा समारोप नाही. तर शेतकर्‍यांना जोवर न्याय मिळत नाही, तोवर आपला लढा, संघर्ष असाच सुरु राहील असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार
दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार
Nagpur News: राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्गठन होणार; सहकार क्षेत्राचे बळकटीकरणाचे उद्दिष्ट की भाजपची राजकीय खेळी?
राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्गठन होणार; सहकार क्षेत्राचे बळकटीकरण कि गाव पातळीवरील सहकारी क्षेत्रात पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न?
पाकिस्तानची स्थिती गंभीर! अन्न संकटाचा मोठा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर  
पाकिस्तानची स्थिती गंभीर! अन्न संकटाचा मोठा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर  

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
Embed widget