एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा समारोप टेंभुर्णीत पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis on State Govt : या सरकारमध्ये कोणीतरी शेतकर्‍यांबद्दल बोलताना तुम्ही पाहिले आहे का? 'पिकेल ते विकेल' अशी घोषणा करायची आणि प्रत्यक्षात 'पिकेल ते जळेल' असे धोरण राबवले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीसमोर जे प्रश्न आहेत, ते बारमालकांचे, विदेशी दारुचे दर कमी करण्याचे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी त्यांना काही लेनदेन नाही. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'जागर शेतकर्‍यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या समारोप टेंभुर्णीत पार पडला. या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या मेळाव्याला फढणवीसांनी संबोधित केलं. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख उपस्थित होते. 


Devendra Fadnavis : राज्य सरकारनं आठ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले, फडणवीसांचा आरोप

आपत्तीत सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही

10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतात आणि 3000 कोटी पण देत नाहीत. निर्णयानंतर वर्षभर यांचे जीआर निघत नाहीत. जीआर असे काढतात की शेतकर्‍यांसाठी अडथळ्यांची शर्यत तयार होते. वादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा कितीतरी आपत्ती येऊन गेल्या. पण, कवडीची मदत या सरकारने केली नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी विम्याचे पैसे भरतो. पण, त्याला पीकविमा मिळत नाही. या सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला आणि शेतकर्‍यांना वाढीव हमीभाव दिला. 10 वर्ष काँग्रेसने हा अहवाल थंडबस्त्यात ठेवला. आज शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. 1.75 लाख कोटी रुपये सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले. 

महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या

आमच्या सरकारने शेततळ्यांची योजना राबवली. गटशेतीची योजना तयार केली. यांत्रिकीकरणासाठी मदत दिली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीने सार्‍याच योजना बंद केल्या आहेत. हे सरकार जुन्या काळातील टेलिफोनसारखे आहे. 1 रुपया टाकला, तरच हॅलो ऐकू येते, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी', तेव्हापासून सर्वच मंत्र्यांचा एकच कार्यक्रम सुरू आहे, 'माझं कुटुंब-माझी जबाबदारी'! या सरकारने शेतकर्‍यांची दैना केल्याचे फडणवीस म्हणाले.

उजनीचे पाणी वळवण्याचं कारस्थान

आता उजनीचे पाणी वळवण्याचे कारस्थान रचले जात आहे. कितीही पोटात गेले तरी काही लोकांची तहानच भागत नाही. सामंतशाही आणण्याचे काम काही नेते करत असल्याचे ते म्हणाले. हा फक्त यात्रेचा समारोप आहे. आंदोलनाचा समारोप नाही. तर शेतकर्‍यांना जोवर न्याय मिळत नाही, तोवर आपला लढा, संघर्ष असाच सुरु राहील असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टीं आक्रमक, आंदोलनाचा इशारा
हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टीं आक्रमक, आंदोलनाचा इशारा
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत
Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर  
Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर  
Monsoon Forecast 2026: मोठी बातमी: यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद
यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Embed widget