एक्स्प्लोर

AI Tech : शेतीसाठी गुगलचा पुढाकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान

गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे.

AI Tech : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian economy) कणा आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला (Agriculture sector) अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या या क्षेत्रात विविध बदल होत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या माध्यमातून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, अशातच आता गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा  (Artificial intelligence) वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामुळं शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. त्यामुळं हवामानासह (weather forecast) शेतीबाबात अचूक माहिती मिळणार आहे.

हवामानाबाबत अचूक माहिती मिळणार 

शेती क्षेत्रात (Agriculture sector) कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांना (Farmers) हवामानाचा अंदाज समजणार आहे. कधी हवामान चांगल असणार, कधी हवामान खराब असणार हे आता शेतकऱ्यांना समजणार आहे. त्यामुळं शेतीबाबत निर्णय घेणं शेतकऱ्यांना सोप जाणार आहे.  याशिवाय या तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक आणि इतर शेतीविषयक माहितीही उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे देशात शेती क्षेत्रात  एक नवा आयाम निर्माण होईल.

यापूर्वीही गुगलने केली होती मदत 

याआधीही, 2019 मध्ये Google कृत्रीम तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी 20 लाख डॉलरची मदत केली होती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं कृत्रिम तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा शेतीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती गुगल रिसर्च इंडियाचे संचालक मनीष गुप्ता यांनी दिली.

AI म्हणजे काय?

AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते. आता या तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर केला जाणार आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. 

शेती क्षेत्राला सातत्यानं नव नवीन संकटांचा सामना करावा लागतो. अधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असतात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होतो. हवामानातील बदलामुळं कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळं अशी संकट येतात. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. 

महत्त्वाच्या बातम्या:

Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी

 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget