एक्स्प्लोर
Man-Animal Conflict: 'माणसे जगवायची की बिबटे?', आढळराव पाटलांचा सरकारला थेट सवाल, शिरूरमध्ये संताप
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागोबाई जाधव या सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. 'सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे की माणसे जगवायची आहेत की बिबटे जगवायचे आहेत?', असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला. आठवडाभरातील हा दुसरा बळी असल्याने नागरिक संतप्त झाले असून, जोपर्यंत वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. बिबट्यांची नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा अधिवासात न सोडता पुनर्वसन केंद्र उभारणे यांसारख्या उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
आणखी पाहा





















