एक्स्प्लोर
Man-Animal Conflict: 'माणसे जगवायची की बिबटे?', आढळराव पाटलांचा सरकारला थेट सवाल, शिरूरमध्ये संताप
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागोबाई जाधव या सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. 'सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे की माणसे जगवायची आहेत की बिबटे जगवायचे आहेत?', असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला. आठवडाभरातील हा दुसरा बळी असल्याने नागरिक संतप्त झाले असून, जोपर्यंत वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. बिबट्यांची नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा अधिवासात न सोडता पुनर्वसन केंद्र उभारणे यांसारख्या उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
करमणूक




















