एक्स्प्लोर

Zero Hour : Bhiwandi Corporation : महापालिकेचे महामुद्दे : भिवंडी-वाडा रस्त्याची दुर्दशा

तुम्ही पाहताय एबीपी माझा. आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर. मंडळी, झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण आढावा घेणार आहोत महापालिकेचे महामुद्देमधल्या खास रिपोर्टसचा. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात भिवंडी आणि वाडा या शहरांकडे. आपल्याकडे काही विकास प्रकल्प इतक्या भीषण अवस्थेत असतात, की प्रश्न पडतो की, हे प्रकल्प मुळात जनतेसाठी राबवण्यात आले आहेत की निव्वळ कंत्राटदारांसाठी? ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वाडा या शहरांना जोडण्यासाठी १५ वर्षांपूर्वी एक नवा रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर त्या रस्त्याच्या दुरुस्तीवर शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण त्यानंतरही आज त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर तो कुठल्याशा युद्धग्रस्त देशातलाच रस्ता वाटतो. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. 

गेल्या पाच वर्षांत या रस्त्याच्या दुरुस्तीवर ३७० कोटी खर्च झालेत, असं सांगितलं तर विश्वास बसेल? 

अजिबात नाही बसणार, पण ते खरं आहे. 

भिवंडी-वाडा-मनोर हा ६० किलोमीटरचा रस्ता जंगलातल्या दगडी वाटेला देखील लाजवेल इतका खराब आहे. 

ठिकठिकाणी पडलेले खड्डे, संथ गतीनं सुरू असलेलं काँक्रिटीकरणाचं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी... यादी फार मोठी आहे. 

या खराब रस्त्यामुळे गेल्या १५ वर्षांत इथं अनेक भीषण अपघात झाले, ज्यामध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, आणि काही हजार लोक जखमी झाले. 

सततच्या कोंडीमुळे १० ते १५ मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी अनेकदा एक ते दीड तास लागतो. 

खरंतर हा रस्ता म्हणजे मुंबई-आग्रा महामार्ग आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. मात्र संपूर्ण मार्ग खड्डेग्रस्त असल्यानं भिवंडीतल्या शेकडो गोदामांमधून निघणारे ट्रक ठाण्यातील घोडबंदर रोडवरून जातात, ज्यामुळे तिथेही मोठी वाहतूक कोंडी होते. २००९मध्ये जवळपास ४०० कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला, त्यानंतर सुप्रीम इन्फ्रा या कंपनाीकडून १० वर्षं टोलवसुली सुरू होती. मात्र टोलकंपनीनं देखभालीच्या नावावर प्रशासनाच्या तोंडाला पानं पुसली. 

त्यामुळे २०१९मध्ये सुप्रीम इन्फ्राकडून हा रस्ता काढून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला. २०१९ ते २०२४ या काळात दुरुस्तीसाठी तब्बल ३७० कोटी खर्च करण्यात आले, मात्र परिस्थितीत कुठलाही फरक पडला नाही. 

ऑक्टोबर २०२४मध्ये या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू झालं. ईगल इन्फ्रा या कंपनीला तब्बल अकराशे कोटींचं काम देण्यात आलं. हे काम मात्र अतिशय संथ गतीनं सुरू आहे. 

त्यामुळे काही दिवसांपूर्वी स्थानिक नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साईटवर बोलावून जाब विचारला

स्थानिक नेत्यांनी अनेकदा आंदोलनं केली, रास्तारोकोे केले. मात्र रस्त्याच्या स्थितीत तसूभरही फरक पडला नाही. 

आपल्याकडची यंत्रणा जनतेला गृहित धरते हेच खरं. बांधकाम आणि दुरुस्तीसाठी एकूण साडे सातशे कोटी खर्च करून रस्त्याची ही अवस्था आहे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या किती अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली? किती अधिकारी निलंबित झाले? एकही नाही. मोठमोठी कंत्राटं द्यायची, मग कंत्राटदार थातुरमातुर काम करणार, त्याची बिलं मात्र पूर्ण रकमेची काढायची, आणि जनतेला वर्षानुवर्षं हाल सोसायला वाऱ्यावर सोडून द्यायचं.. यालाच जर विकासकाम म्हणायचं असेल तर मग पुढे काही बोलायलाय नको. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget