Zero Hour Republic Day : 77 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा, देशात आणि राज्यात मोठा उत्सव
Zero Hour Republic Day : 77 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा, देशात आणि राज्यात मोठा उत्सव
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम अशा आपल्या मायभूमीच स्मरण करण्याचा आणि तिरंग्याला सलाम करण्याचा आजचा दिवस दोन सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणांपैकी एक दिल्लीच्या कर्तव्यपथापासून ते एखाद्या गल्लीतल्या छोट्याशा मैदानापर्यंत देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वजाला सॅल्युट करताना आज अभिमानाचा क्षण सर्वांनीच अनुभवला असेल आजच्या झिरो आपण बघूयात प्रजासत्ताक दिनाची काही चांगली क्षणचित्र आणि हो काही ठिकाणी झालेले किरकोळ वादही त्यासाठी मी पूर्वी भावे तुमच स्वागत करते. झिरो आवरच्या प्रेक्षकांना 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छाही देते. नवी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये कर्तव्य पथावरती भारतीय सैन्यदलाची ताकद आणि संस्कृतीचा मिलाप दाखवणार देखण संचालन झालं. यंदा एक दोन नव्हे तर 27 देशांचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले. युरोपीय कान्सिलचे प्रेसिडेंट अंटोनियो कोस्टा आणि युरोपीय महासंघाच्या प्रेसिडेंट उर्सुला वन डेरलेन तर राज्याचा मुख्य कार्यक्रम झाला प्रथेप्रमाणे शिवाजी पार्कामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर पोलीस अग्निशमन दल आदी पथकांचे देखण संचालन पार पडलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थिती दाखवली तर पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण केलं हा पण अपवाद होता बुलढाण्याचा तिथे ध्वजवंदनाच्या शासकीय कार्यक्रमाला ना पालकमंत्री पोहोचले ना जिल्ह्यातले आणखीन कोणी मंत्री त्यामुळे मग प्रथेला बगल देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला घडलं ते योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं त्यासाठीच आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्हाला सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देता येतील आणि कौलही देता येईल तेव्हा आमचा आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला झिरोवरचा आजचा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा प्रश्न आहे. बुलढाणामध्ये चार मंत्री असताना ध्वजवबंधनाला एकही हजर नाही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांवरती कारवाई करावी असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. आता बुलढाण्यामध्ये नेमकं काय घडलं? आणि त्याचं कारण काय आहे? हे पुढे बघुयात. पण सर्वात आधी मुंबईमध्ये शिवाजी पार्क मधल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची काही क्षणचित्र बघूयात. राज्यातल्या या मुख्य सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा फडकवला गेला. तत्पूर्वी ओपन जीप मध्ये मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा दलांची मानवंदना स्वीकारली. ध्वजारोहणानंतर झालेल्या परेडमध्ये पोलीस अग्निशमन दल, राज्य राखीव दलाच्या पथकांबरोबरच नौदल, एनसीसीच्या्या जवानांनीही शिस्तबद्ध संचालन केल. तसच विविध खात्यांच्या चित्ररथांमधन राज्याच्या संस्कृतीच आणि शक्तीच दर्शन घेतल संचालनानंतर झालेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी काम करण्याची गवाही दिली आहे पाहयात >> देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि नुकतंच टॅबोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहील अशा पद्धतीने महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी सुखावला पाहिजे या दृष्टीने देखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने भूमिका घेतली पुढच्या टप्प्यामध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा आपल्या शासनाच्या माध्यमातन केला जाणार आहे. >> राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदनाचा मान मिळाला. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पथसंचालन करत पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी शिस्तीचे दर्शनही घडवलं. तर एकता शिंदेनी आपला बाले किल्ला म्हणजेच ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकंना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण राज्यात असलो तरी ठाणे ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या मातीशी माणसांशी माझं रक्ताचा नातं आहे. दावस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आपले उद्योगमंत्री उदय सामंजी यांनी जवळपास तब्बल 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे अमोई साईन केलेले आहे. 40 लाख रोजगार त्यातून निर्माण होणार आहेत. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
All Shows


































