एक्स्प्लोर

Rohit Sharma : पडलेला चेहरा, आवाजात भावनिकता; कॅप्टन रोहितची वर्ल्डकप हरल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी पहिली जाहीर मुलाखत, भावनांना वाट मोकळी करून दिली

Rohit Sharma : विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माने काही दिवस विश्रांती घेतली. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला आणि आता विश्वचषक संपल्यानंतर 20 दिवसांनी रोहित शर्माने पहिल्यांदाच मुलाखत दिली.

Rohit Sharma Interview after World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 संपून एक महिना होत चालला आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची निराशा अजून लपलेली नाही. विश्वचषकात रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आणि आपल्या संघाला अत्यंत शानदारपणे अंतिम फेरीत नेले होते. रोहित शर्माच्या संघाने सुरुवातीपासून उपांत्य फेरीपर्यंत एकामागून एक सर्व 10 सामने जिंकले होते आणि त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता, परंतु त्या सामन्यात पराभवानंतर रोहित शर्मा इतका निराश झाला होता की त्याला आपल्या भावना लपवता आल्या नाहीत आणि मैदानावरच रडू कोसळले.

वर्ल्डकप फायनलनंतर रोहितची पहिली मुलाखत 

विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माने काही दिवस विश्रांती घेतली होती. त्याने कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला आणि आता विश्वचषक संपल्यानंतर 20 दिवसांनी रोहित शर्माने पहिल्यांदाच मुलाखत दिली. या मुलाखतीतही रोहित शर्माच्या चेहऱ्यावरची निराशा आणि त्याच्या आवाजात भावनिकता स्पष्टपणे झळकते. 

रोहित म्हणाला की, "मला या दु:खातून कसे बाहेर पडावे, याची कल्पना नव्हती, सुरुवातीचे काही दिवस मला काय करावे हे देखील कळत नव्हते. त्यानंतर माझे कुटुंब आणि मित्रांनी माझ्यासाठी चांगले वातावरण तयार केले, मला त्या दुःखावर मात करण्यास मदत केली. ते (विश्वचषक अंतिम पराभव) विसरणे सोपे नाही, पण आयुष्य पुढे सरकते आणि तुम्हीही पुढे जा. पण खरे सांगायचे तर ते खरोखर अवघड होते."

रोहित पुढे म्हणाला की, "मी लहानपणापासून 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे आणि माझ्यासाठी 50 षटकांचा विश्वचषक हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आम्ही या विश्वचषकासाठी इतकी वर्षे काम केलं आणि ते खरंच आहे. जेव्हा तुम्ही हा खेळ खेळता आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळत नाही, तुम्ही ज्याचे स्वप्न पाहता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही निराश होता."

अंतिम फेरीनंतर पुढे जाणं कठीण होते

टीम इंडियाचा कर्णधार पुढे म्हणाला की, "मला वाटतं की आम्ही आमच्या बाजूने जे काही करता येईल ते केले. कोणीतरी मला विचारले, तू काय चूक केलीस? कारण आम्ही 10 सामने जिंकले, आणि "त्या 10 सामन्यांमध्येही आम्ही चुका केल्या आणि त्या चुका प्रत्येक सामन्यात घडतात. तुम्ही एक सामना पूर्णपणे चांगला खेळू शकत नाही, तुम्ही एक सामना खूप चांगला खेळू शकता, परंतु तुम्ही पूर्णपणे चांगले खेळू शकत नाही."

आपल्या संघाबद्दल बोलताना रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जर मी त्याची दुसरी बाजू पाहिली तर आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ती खरोखरच चांगली कामगिरी होती, कारण प्रत्येक विश्वचषकात तुम्हाला अशी कामगिरी होत नाही, आम्ही फायनलपर्यंत ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे लोकांना आनंद आणि अभिमान वाटला असेल.”

हिटमॅन पुढे म्हणाला की, "अंतिम सामन्यानंतर परत येणे आणि पुढे जाणे खूप कठीण होते, म्हणून मी ठरवले की मी कुठेतरी जावे आणि या सर्व गोष्टींमधून माझे मन काढले पाहिजे. यादरम्यान बरेच लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी आमचे कौतुक केले. मला त्या सर्व लोकांचे वाईट वाटते, कारण ते नेहमी आमच्या सोबत होते, आणि आमच्यासोबत विश्वचषक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते. या विश्वचषकादरम्यान आम्ही जिथे जिथे गेलो तिथे आम्हाला चाहत्यांचा भरपूर पाठिंबा होता, जे स्टेडियमवर आले, घरून सामने पाहिले, त्या सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. त्या दीड महिन्यांत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी कौतुक करतो, परंतु मी जितका विचार करेन तितका मी अधिक निराश होतो, मग पुढे जाऊ शकणार नाही."

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget