एक्स्प्लोर

बंगळुरु वन डेत ऑस्ट्रेलियाची भारतावर २१ धावांनी मात

ऑस्ट्रेलियानं भारतावर २१ धावांनी मात करून पाच सामन्यांच्या मालिकेतली आपली पिछाडी १-३ अशी भरून काढली.

बंगळुरु  : टीम इंडियाची मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली विजयाची मालिका अखेर आज खंडीत झाली. बंगळुरुच्या चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियानं भारतावर २१ धावांनी मात केली पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत भारताने तीन विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियानं एक विजय मिळवला आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं १०६ धावांची सलामी देऊन टीम इंडियाच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. पण त्या दोघांपाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला आणि भारतीय संघ संकटात सापडला. केदार जाधवनं आधी हार्दिक पंड्या आणि मग मनीष पांडेच्या साथीनं प्रयत्नांची शर्थ केली. पण विजयासाठीचं धावांचं समीकरण वाढतच गेलं आणि ते गाठण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया अयशस्वी ठरली. दरम्यान, ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय फिंच आणि वॉर्नरनं अगदी योग्य ठरवला. या दोन्ही सलामीवीरांनी २३१ धावांचा भक्कम पाया रचला. ज्या जोरावर कांगारूंनी ५० षटकांत पाच बाद ३३४ धावांचा डोंगर रचला. त्यात वॉर्नरचा वाटा १२ चौकार आणि चार षटकारांसह १२४ धावांचा होता. कारकीर्दीतल्या शंभराव्या वन डेत शतक झळकावणारा तो जगातला आठवा फलंदाज ठरला. वॉर्नरचा सलामीचा साथीदार अॅरॉन फिन्चचं शतक सहा धावांनी हुकलं. त्यानं १० चौकार आणि तीन षटकारांसह ९४ धावांची खेळी केली. या सामन्यासाठी टीम इंडियानं कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या तीन प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती. त्या तिघांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय आक्रमणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताकडून उमेश यादवनं ७१ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.