एक्स्प्लोर

IND vs ENG : भारताला विजयासाठी 84 धावांची गरज

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अजूनही 43 धावांवर खेळत आहे. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाच्या आव्हानात अजूनही धुगधुगी कायम आहे.

बर्मिंगहॅम : टीम इंडिया आणि इंग्लंड संघांत एजबॅस्टन कसोटी जिंकण्यासाठी सीसॉचा खेळ सुरु आहे. या कसोटीत टीम इंडियासमोर विजयासाठी 194 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसअखेर पाच बाद 110 धावांची मजल मारली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अजूनही 43 धावांवर खेळत आहे. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाच्या आव्हानात अजूनही धुगधुगी कायम आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराटच्या साथीने दिनेश कार्तिक 18 धावांवर खेळत होता. इंग्लिश गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ अवघ्या 78 धावांत माघारी धाडला होता. त्या परिस्थितीत विराट आणि कार्तिकने सहाव्या विकेटसाठी 32 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.

ईशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विनच्या प्रभावी गोलंदाजीनं टीम इंडियाला एजबॅस्टन कसोटी जिंकण्याची संधी मिळवून दिली आहे. या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांत गुंडाळला. इंग्लंडला पहिल्या डावात मिळालेली 13 धावांची आघाडी जमेस धरता, टीम इंडियासमोर विजयासाठी 194 धावांचं आव्हान आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मानं 51 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात चार विकेट्स घेणारा ऑफ स्पिनर अश्विन दुसऱ्या डावातही प्रभावी ठरला. त्यानं दुसऱ्या डावात तीन विकेट्स काढल्या.

तिसऱ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात 1 बाद 9 धावा अशी केली. मात्र भारतीय अश्विन आणि ईशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या खेळाडूंचा निभाव लागू शकला नाही. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव सावरणारे ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो या डावात मात्र संघाला सावरू शकले नाहीत.

कोहलीचं ऐतिहासिक शतक

पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडच्या भूमीवर पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टन कसोटीत भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटच्या जिगरबाज 149 धावांनी टीम इंडियाला पहिल्या डावात सर्व बाद 274 धावांची मजल मारुन दिली.

विराटचं हे आजवरच्या कारकीर्दीतलं 22 वं आणि इंग्लिश भूमीवरचं पहिलं कसोटी शतक ठरलं. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी डावात अर्धशतक ठोकणारा कोहली हा पाचवा भारतीय कप्तान ठरला आहे.

विजय हजारे (1952 मध्ये 89 धावा), मन्सूर अली खान पतौडी (1967 मध्ये 64 धावा), अजित वाडेकर (1971 मध्ये 85), मोहम्मद अझरुद्दीन (1990 मध्ये 120 धावा) यांच्या पंक्तीत कोहली पोहचला आहे.

इंग्लंडला पहिल्या डावात 287 धावांवर रोखलं

मोहम्मद शमीनं सॅम करनला माघारी धाडून एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाला 287 धावांवर पूर्णविराम दिला. या कसोटीत इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर नऊ बाद 285 धावांची मजल मारली होती. इंग्लंडला त्या धावसंख्येत आज केवळ दोन धावांची भर घालता आली.

करननं शमीच्या उजव्या यष्टिबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती सोपा झेल दिला. तो शमीनं तिसरी विकेट ठरला. भारताकडून रवीचंद्रन अश्विननं 62 धावांत चार, तर शमीनं 64 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीमुळंच इंग्लंडचा डाव चार बाद 216 धावांवरून 287 धावांत कोसळला.

महत्त्वाच्या बातम्या

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget