एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 - यजमान इंग्लंडला नमवून टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार?

पण इंग्लंड हा इतिहास बदलू शकेल? की टीम इंडियाची घोडदौड अशीच सुरु राहील? फॅब्युलस विराट कोहली आणि फॅब्युलस ज्यो रुट यापैकी कोण आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहेत.

बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना उद्या यजमान इंग्लंडशी होत आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. टीम इंडियानं बर्मिंगहॅमची ही लढाई जिंकली, तर त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होईल. पण इंग्लंडला विश्वचषकातलं आव्हान राखायचं, तर भारतीय संघाला हरवणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत आणि इंग्लंड संघांमधला हा सामना अतिशय चुरशीचा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. विराट कोहली आणि ज्यो रुट.... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या फॅब्युलस फोरपैकी दोन महत्वाचे शिलेदार. आणि हे दोघेही जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल याची उत्सुकता तमाम क्रिकेटरसिकांना लागून राहिली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघांमध्ये विश्वचषकाचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यफेरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याचं कारण विराटसेनेची सरशी झाल्यास टीम इंडियाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल. आणि इंग्लंडला उपांत्य फेरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात ठेवावे लागतील. उभय संघांमधला हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात अपराजित असलेला एकमेव संघ आहे. आणि याचं मोठं श्रेय जातं ते कर्णधार विराट कोहलीला.  विराटनं या विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये 63.20 च्या सरासरीनं 316 धावा केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 82, पाकविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि वेस्ट इंडिजवरुद्ध 72 अशा सलग चार अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय कर्णधाराच्या या विराट कामगिरीप्रमाणेचं इंग्लंडसाठी ज्यो रुटची कामगिरी महत्वाची ठरली आहे.  रुटनं या विश्वचषकात सात सामन्यात 72 च्या सरासरीनं 432 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. रुटच्या या कामगिरीमुळे ऑइन मॉर्गनच्या इंग्लिश फौजेनं सातपैकी चार सामन्यांत यश मिळवलंय. त्यामुळे एजबॅस्टनवर रुटची कामगिरी इंग्लंडसाठी निर्णायक ठरेल. विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडला विजेतेपदानं वारंवार हुलकावणी दिली आहे. यावेळी मायदेशात विजेतेपदाचं ते स्वप्न साकारण्याच्या निर्धारानं इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. पण उपांत्य फेरी इंग्लंडसाठी अजूनही लांब आहे. 1999 पासून  विश्वचषकात इंग्लंडला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. 1999 आणि 2003 साली भारतानं इंग्लंडचा मोठ्या फरकानं धुव्वा उडवला होता. तर 2011 च्या विश्वचषकातला सामना टाय झाला होता. यंदाच्या विश्वचषकातला टीम इंडियाचा ताजा फॉर्म पाहता इंग्लंडसाठी हा इतिहास बदलणं सध्यातरी कठीण वाटत आहे. पण इंग्लंड हा इतिहास बदलू शकेल? की टीम इंडियाची घोडदौड अशीच सुरु राहील? फॅब्युलस विराट कोहली आणि फॅब्युलस ज्यो रुट यापैकी कोण आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget