एक्स्प्लोर

Champions Trophy :..तर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार नाही, माजी क्रिकेटरनं दिला मोठा इशारा 

Champions Trophy : पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे.

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानात (Pakistan) केलं जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होत असून भारताचे सामने लाहोरच्या मैदानात आयोजित करण्याचं पीसीबीचं नियोजन आहे. सुरक्षेच्या कारणामुळं भारताचे सामने एकाच स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा विचार पीसीबीचा आहे. मात्र, भारतानं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं भारतानं हायब्रीड पद्धतीनं स्पर्धा राबवण्याची मागणी केली आहे. भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत घ्यावेत असा भारताचा प्रस्ताव आहे. तर, भारतानं आमच्या देशात क्रिकेट खेळण्यास यावं, अशी भूमिका पाकिस्तानची आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनी पीसीबीला इशारा दिला आहे. सुरक्षेच्या बाबतीत काहीही गडबड झाली तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हातातून निसटेल, असा इशारा त्यांनी दिला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार बासित अली यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. आपल्याला सुरक्षेचं विशेष ध्यान ठेवायला लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी पाकिस्तान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सामने खेळणार नाही. याशिवाय बांगलादेश देखील पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.   या मालिकांमध्ये कोणताही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास पाकिस्तानच्या हातून आयसीसी चॅम्पियन्स् ट्रॉफीचं आयोजक हे पद शकतं, असं बासित अली म्हणाले. 

बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. यातील पहिली मॅच 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत होणार आहे.  दुसरी कसोटी 30 ऑगस्टपासून कराचीत होणार आहे. यानंतर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पाकिस्तान- इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर, दुसरी कसोटी 15 ऑक्टोबर पासून होणार आहे.  तर तिसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका मुल्तान, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहे.    

भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला नाही. यानंतर 2012 आणि  2013 मध्ये दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवली गेली होती. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघ  2023 मध्ये आशिया कप स्पर्धेवेळी देखील पाकिस्तानला गेला नव्हता. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. 

दरम्यान, भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने श्रीलंकेत किंवा दुबईत आयोजित करण्याबाबत देखील विचार केला जाऊ शकतो. 

संबंधित बातम्या:

क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

नताशा स्टॅनकोविकने लाईक केलेल्या दोन पोस्ट बनल्या चर्चेचा विषय; सोशल मीडियावर उडाली खळबळ

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक, अर्शदीप OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल भारताची Playing XI
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल
इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र बेळ बदलली; चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
Embed widget