एक्स्प्लोर

'भ्याडपणा' हा भाजप आरएसएस विचारसरणीचा गाभा, दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात; परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं? संघाच्या 'शंभरी'ला राहुल गांधींचा प्रहार

राहुल गांधी यांनी कोलंबियातील ईआयए विद्यापीठातील परिषदेत भाजप-आरएसएसवर भ्याडपणाचा आरोप करत चीन, लोकशाही, आरोग्य व शिक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटले आहेत.

Rahul Gandhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या विचारसरणीमध्येच मुळातच भ्याडपणा असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi Colombia Speech) यांनी केला आहे. राहुल यांनी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात "द फ्युचर इज टुडे" परिषदेत (Rahul Gandhi Future conference) हे विधान केले. राहुल (Rahul Gandhi Latin America tour) दक्षिण अमेरिकन देशांच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोलंबिया व्यतिरिक्त, राहुल ब्राझील, पेरू आणि चिलीलाही भेट देणार आहेत.

भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा

राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या 2023 मध्ये चीनबाबतच्या विधानाचा हवाला देत जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की, "जर तुम्ही परराष्ट्रमंत्र्यांच्या एका विधानाकडे पाहिले तर ते म्हणाले की चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा आहे. ते दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालीपासून पळून जातात. हा भाजप-आरएसएसचा स्वभाव आहे." राहुल यांच्या टीकेनंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल परदेशात बसून भारताची बदनामी करत आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल परदेशी लोकांच्या हातात आहे. मोदी आणि भाजपला विरोध करतानाच, ते आता भारत आणि त्याच्या संस्थांना विरोध करायला लागले आहेत, असे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "भारतात सत्तेत असलेल्यांना प्रत्येक संस्थेला त्यांच्या इच्छेनुसारच काम करायची असते. हे भारताच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे." विद्यार्थ्यांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी सांगितले की लोकशाहीत मतभेदांच्या आवाजांना स्थान मिळाले पाहिजे.

परिषदेत राहुल गांधींसोबत प्रश्नोत्तर सत्र

प्रश्न: जगात सुरू असलेल्या ध्रुवीकरणाबद्दल तुम्हाला काळजी वाटते का?

उत्तर: मी फक्त भारताच्या संदर्भात बोलू शकतो. भारतासारखा मोठा देश नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्याही बंद पडल्या आहेत. भारतातही अशीच परिस्थिती आहे. आपल्याला चीनकडून शिकण्याची गरज आहे. भारताने चीनकडून उत्पादन कसे वाढवायचे ते शिकले पाहिजे, पण लोकशाही पद्धतीने. भारतालाही अनेक जोखमींना तोंड द्यावे लागेल.

प्रश्न: धोके कोणते आहेत?

उत्तर: भारताच्या लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी धोका आहे; सध्या भारतातील अनेक भागात हे घडत आहे. आपण चीनप्रमाणे लोकांचा आवाज दाबू शकत नाही. भारतातील फक्त 2-3 टक्के लोकांकडे उच्च तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरची उपलब्धता आहे. हे अत्यंत कमी आहे. भारत केवळ सेवांवर आधारित विकास साध्य करू शकत नाही. स्वतः ट्रम्प यांना केवळ उत्पादनाकडे परतणे कठीण होईल. अमेरिका हा एकेकाळी सर्वात मोठा उत्पादक होता, परंतु आता तो राहिला नाही. सध्या, सर्वात जास्त उत्पादन युनिट असलेला देश आघाडीवर आहे. 21 वे शतक केवळ कारखान्यांवर अवलंबून राहू शकत नाही.

प्रश्न: भारताच्या आरोग्य आणि शिक्षणाबद्दल तुम्ही काय म्हणाल?

उत्तर: भारतातील आरोग्य आणि शिक्षणात एआय मोठी भूमिका बजावणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग खाजगी रुग्णालयांवर अवलंबून आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही मोठ्या गरीब वर्गाला सरकारी सेवा देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी देश होऊ शकत नाही. यावर आमच्या पक्षाचे विचार एकमत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget