Trump Attack Plan: अमेरिका वीकेंडलाच अटॅक का करतो? यामागील डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी काय? जाणून घ्या सविस्तर
Trump Attack Plan: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक निर्णयामागे एक विशिष्ट रणनीती असते. आठवड्याच्या शेवटी झालेल्या लष्करी कारवाईमागे ट्रम्प यांचाचं डोकं असल्याचं बोललं जातंय.

Trump Attack Plan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या लष्करी निर्णयांमागे ठराविक रणनीती कार्यरत असल्याची चर्चा आहे. अलीकडे व्हेनेझुएला आणि इराणविरोधातील कारवाया शनिवार-रविवारी झाल्याने, वीकेंडची निवड ही केवळ योगायोग नसून नियोजित (Trump Attack Plan) धोरणाचा भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री अमेरिकेने इराणविरोधात लष्करी पावले उचलली. यापूर्वीही अशाच प्रकारे विकेंडलाच हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठा, तेलपुरवठा आणि कूटनीतिक घडामोडींचा विचार करून वेळेची निवड केली जाते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(Trump Attack Plan)
वीकेंडची निवड का?
तज्ज्ञांच्या मते, यामागे जागतिक शेअर बाजार आणि तेल बाजाराचा विचार असू शकतो. आठवड्याच्या शेवटी बहुतेक देशांचे शेअर बाजार बंद असतात. जर लष्करी कारवाई कामकाजाच्या दिवशी झाली, तर बाजारात तात्काळ घबराट निर्माण होऊ शकते. वीकेंडदरम्यान कारवाई झाल्यास सरकारे आणि गुंतवणूकदारांना परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी वेळ मिळतो. सोमवारी बाजार सुरू होईपर्यंत प्राथमिक नुकसानाचा अंदाज येतो आणि अचानक घसरण किंवा उसळी टाळता येते.(Trump Attack Plan)
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तेल बाजार. मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला की कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढतात. जर बाजार खुले असताना हल्ले झाले, तर दरात तीव्र चढ-उतार होण्याची शक्यता असते. वीकेंडमध्ये कारवाई झाल्यास तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देशांना आणि ओपेकसारख्या संघटनांना संधी मिळू शकते.(Trump Attack Plan)
केवळ बाजार नव्हे, इतर घटकही महत्वाचे
अहवालांनुसार, लष्करी निर्णय केवळ आर्थिक बाजारपेठ लक्षात घेऊन घेतले जात नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा, सामरिक हितसंबंध आणि राजकीय कारणेही तितकीच महत्त्वाची असतात. मात्र कारवाईची वेळ ठरवताना जागतिक परिणाम कमी कसे ठेवता येतील, याचाही विचार केला जातो.
भारतासाठी का चिंतेचा विषय?
भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा कच्च्या तेलाचा मिडल ईस्टमधून आयात करतो. त्यातील बहुतांश पुरवठा स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे येतो. या भागात तणाव वाढल्यास किंवा मार्गात अडथळा निर्माण झाल्यास भारताला तेल महागात मिळू शकते. तेलाच्या किमती वाढल्यास देशांतर्गत पेट्रोल-डिझेल दर वाढण्याची शक्यता असते. त्याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. वाहतूक खर्च वाढल्यास दैनंदिन वापराच्या वस्तूही महाग होऊ शकतात. तसेच तेल आयातीवरील खर्च वाढल्यास देशाचे आयात बिल आणि चालू खाते तूट वाढण्याची शक्यता असते. सध्या मोठ्या प्रमाणात पुरवठा खंडित झाल्याचे संकेत नसले तरी, सततचा तणावही दर उंचावण्यासाठी पुरेसा ठरतो. त्यामुळे अशा लष्करी कारवाया भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी चिंतेचा विषय ठरतात.
























