एक्स्प्लोर

Temple Reopen : सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया

धार्मिक स्थळं उघडण्याचा घेऊन सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या निर्णयावर दिली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.  तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. अखेर आठ महिन्यांनी भाविकांना

सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण

राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. मंदिरं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु आजच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी योग्यवेळी निर्णय घेतला- जयंत पाटील राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी दिवाळीच्या मंगलदिनी हा निर्णय घेतला आहे. तरीही भाजपचे नेते का ओरड करत आहेत माहिती नाही. भाविकांना मंदिरं खुली झाली तरी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यांची खबरदारी घ्यावी- अरविंद सावंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही सातत्याने सांगते होतो धीर धरा. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडी होत आहेत, त्यामुळे आता जबाबदारी आपली आहे. कोरोना संदर्भातले सर्व नियम भाविकांनी पाळले पाहिजेत. आपल्यामुळे परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाणार नाही यांची काळजी आपण घेतली पाहिजे.

Temples Reopen: पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

उशिरा का होईना पण चांगला निर्णय : इम्तियाज जलील

उशिरा का होईना पण सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. आम्ही दोन महिन्यांपूर्वी यासाठी आंदोलन केलं होतं. मंदिरं, प्रार्थनास्थळं बंद असल्याने अनेकांच्या व्यवसाय ठप्प झाले. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहेत. परंतु आता धार्मिक स्थळं उघडण्याचा घेऊन सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या निर्णयावर दिली.

सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन : भाजप आध्यात्मिक आघाडी

उशिरा का होईना पण ठाकरे सरकारने निर्णय घेतला. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो. याचं श्रेय भाविकांच्या, साधुसंतांच्या आंदोलनाला जातं. नियमांचं अत्यंत काटेकोरपणे दर्शन घेतलं जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने दिली आहे.

अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्वधर्मियांची ही मागणी होती. आम्ही समाधानी आहोत आणि सरकारला धन्यवाद देतो. मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे, असं मत महंत सुधीरदास यांनी सरकारच्या निर्णयावर व्यक्त केलं.

सोमवारपासून राज्यातली मंदिरं उघडणार! सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरु करण्यास परवानगी

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Embed widget