एक्स्प्लोर

राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं! ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा 

 उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे.

Solapur :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले तर आम्हालाही आनंद होईल असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलं आहे. राज ठाकरेंची काहीही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोपपही आझमी यांनी केला. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात. मराठी आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेचीच ताकद कमी होऊ शकते, असा दावा आबू आझमी यांनी केला आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा असली पाहिजे

संसदेत भाषेच्या संदर्भात एक कमिटी आहे. यामध्ये 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात, अस आझमी म्हणाले. केंद्र सरकारचे सगळं काम हे हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे असे आझमी म्हणाले. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे असेही आझमी म्हणाले. 

मराठीचा सन्मान झाला पाहिजे

बाळा नांदगावकर हे जनतेची दिशाभूल करत असल्याची आझमी म्हणाले. मनसेचे 14 आमदार आले होते आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे झाले नाही तरी मी मराठीसाठी प्रयत्न करतो. तरीपण मी मराठीची इज्जत करतो असे आझमी म्हणाले. मराठीचा सन्मान झाला पाहिजे पण हिंदीचा अपमान झाला नाही पाहिजे असेही आझमी म्हणाले.  शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ती फक्त ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडली आहे..

महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे असे आझमी म्हणाले. 

आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करणार

अमेरिकेने इराण हल्ला केला आहे. आम्हालाही वाटतं की इराणला पाठिंबा दिला पाहिजे असे आझमी म्हणाले.आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरते काम करत आहे. ज्या मोठं मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग आता यांच्या हातातील खेळण झाल्याचे आझमी म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Chandrashekhar Bawankule: अबू आझमींनी मुजोरी करू नये, ईदला आमचा विरोध नाही, पण...; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News:पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  
पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget